HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची झाली अँजिओग्राफी 

मुंबई। राष्ट्रवादीचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना काल (२८ जुलै) राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत अस्वस्थ वाटू लागल्याने तात्काळ त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात नेण्यात आले होते. आज (२९ जुलै) जयंत पाटील यांच्यावर अँजिओग्राफी चाचणी करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी स्वत: ट्विट करत याची माहिती दिली आहे. आज ब्रीच कँडी रुग्णालयात माझी अँजिओग्राफी चाचणी झाली असून त्यात कोणताही दोष आढळलेला नसल्याने काळजीचे कारण नाही. दोन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यानंतर लगेचच जनसेवेत रुजू होण्याचा माझा मानस आहे. आपण व्यक्त केलेल्या संवेदनांप्रती मी आपला आभारी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना काल मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, ते मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून हॉस्पिटलमध्ये रवाना झाले होते. आले. जयंत पाटील यांनी नुकताच पूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. जयंत पाटील यांनी सांगली, कोल्हापूरमधील पूरस्थितीची पाहणी केली होती. अजित पवारांच्या दौऱ्यातही ते सोबत होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पूर नुकसानीची माहिती दिली होती.

जयंत पाटलांनी काल दिली ट्विट करून माहिती

काल मंत्रिमंडळ बैठक सुरु असताना, जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे जयंत पाटील स्वत: बैठकीतून बाहेर चालत आले आणि ब्रीच कँडी रुग्णालयाकडे जाण्यासाठी निघाले. अस्वस्थ वाटू लागल्याने जयंत पाटील रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र आता खुद्द जयंत पाटील यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सुचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. अशा पद्धतीचे ट्विट जयंत पाटील यांनी केले होते.

पूरस्थितीच्या काळात यंत्रणांना सूचना

सांगलीचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पूरस्थितीच्या काळात यंत्रणांना सूचना देत पाहणी केली होती. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्यामुळे नदीकाठची गावं आणि सांगली शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पाहणीसाठी रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं होतं. अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, तर काही ठिकाणी ट्रॅक्टरने, पाण्यात बोटीचा वापर करत जयंत पाटलांनी सांगलीतील पूरस्थितीची दिवसभर पाहणी करत समस्या जाणून घेतल्या आणि नागरिकांना धीर दिल्याचं पाहायला मिळालं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवावं आणि…”, ऊर्जामंत्र्यांचं आवाहन

News Desk

मुंबईत मुसळधार पाऊस, ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प

News Desk

खुशखबर! एसटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार लवकरच मिळणार

News Desk