HW News Marathi
महाराष्ट्र

तुमचे चेहरे पहिल्यानंतर कोरोना जगात नाही असे वाटते…

पंढरपूर | राज्यात एका दिवसाला आता ५० हजारांच्या पुढे कोरोना रुग्ण आढळत असल्याने सरकारने क़डक निर्बंध लागू केले आहेत. धार्मिक, राजकीय अशा सगळ्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. मात्र, तरीही कुठेतरी सरकारमधीलच काही नेत्यांकडून या निर्बंधांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसत आहे. काल (४ एप्रिल) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या येऊ घातलेल्या पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पंढरपूरात गेले असता त्यांनी एक धक्कादायक विधान केले होते. तुमचे चेहरे पहिल्या नंतर कोरोना जगात नाही असे वाटत आहे. यामुळे मास्क काढून बोलतोय असे शासन विरोधी वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले होते.

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालक मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे, भगिरथ भालके यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार भारत भालके यांचा कोरोना या संसर्ग जन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मृत्यू झाला आहे. भालके यांच्या निधनाने पोटनिवडणूक लागली आहे. तर दुसरीकडे माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा देखील कोरोनामुळेच मृत्यू झाला आहे. असा अनुभव असल्याने राजकीय मंडळींनी कोरोनाबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यासाठी असलेले सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेस कडून घेण्यात आलेल्या सभेला प्रचंड गर्दी करण्यात आली होती. त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे सॅनिटायझरची सोय नव्हती. अनेक कार्यकर्त्यांनी मास्कचा वापर केला नव्हता. असे असताना देखील मंत्रांनी कोरणा बाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. मात्र स्वतः च जयंत पाटील यांनी तुमचे चेहरे पहिल्या नंतर कोरोना जगात नाही असे वाटत आहे. यामुळे मास्क काढून बोलतोय असे वक्तव्य केले. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोरणाबाबत अजूनही गंभीर नसल्याचे दिसून येत आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारची शेतकरी कर्जमाफी २ लाखापर्यंत, जाणून घ्या काय आहे ‘अध्यादेश’

News Desk

‘स्वप्न पाहण्याचा सर्वांनाच अधिकार, पण…’, नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

News Desk

रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेडच्या मालमत्तेवर ईडीचा छापा!

News Desk