HW News Marathi
महाराष्ट्र

“मोदीजी हे वागणं बरं नव्हं” असा सल्ला फडणवीसांनी मोदींना द्यावा !

वाशिम । “आम्हाला सल्ले देण्यापेक्षा फडणवीसांनी ‘मोदीजी हे वागणं बरं नव्हं”, असा सल्ला द्यावा अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. कारंजा विधानसभा मतदारसंघात आढावा बैठकीत जयंत पाटील बोलत होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्य सरकारला सल्ला देताना म्हणतायत की, राज्य सरकारने इंधनावरची कर कपात करून पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत. पण केंद्रसरकारने अजूनही राज्याच्या जीएसटीचा परतावा दिलेला नाही याची आठवणही जयंत पाटील यांनी फडणवीसांना करून दिली.

पंतप्रधान मोदींना दिल्लीत बसून हुकूमशाहीचा रोग !

“पंतप्रधान मोदी यांना दिल्लीत बसून हुकूमशाहीचा रोग लागला आहे. म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. पेट्रोलचे दर शंभरीच्या नजीक पोहोचले आहेत. आपल्या देशाच्या अर्थमंत्री प्रचंड विद्वान आहेत. पेट्रोलवर कर लावा आणि महसूल जमवा हेच केंद्रसरकारचे धोरण झाले आहे”, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी ७ वाजता कोणती मोठी घोषणा करणार ?जनतेशी साधणार संवाद

News Desk

ऊसतोड मजुरांना अडवल्यामूळे आमदार सुरेश धस यांना अटक, तर गुन्हा नोंदवून जामिनावर सुटका

News Desk

रामदास आठवलेंची भूमिका मराठी भाषेविरूद्ध?

News Desk