HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला फडणवीसांनी स्पष्ट करावं-जयंत पाटील

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थिल्लरपणा करु नये असे वक्तव्य काल (१९ ऑक्टोबर) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. “देवेंद्र फडणवीस यांना कोणताही मुद्दा राहिला नाही, म्हणून मुख्यमंत्र्याविषयी त्यांनी असं विधान केलं. असे शब्द वापरणे चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला हे फडणवीसांनी स्पष्ट करावं. प्रत्येक वेळी संकटाचा सामना करताना मुख्यमंत्र्यांनी समजूतदारपणा दाखवला”, असं जयंत पाटील म्हणाले. मुंबईतील पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली.

तसेच, जलयुक्त शिवाराच्या होणाऱ्या चौकशीवरीही जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. “देवेंद्र फडणवीस यांचा आवज दाबण्यासाठी जलयुक्त शिवार चौकशी असं कोणी सांगितलं? कॅगने काही तपास केला. फडणवीस यांनी भ्रष्टाचार केला असं कोणीही म्हटलं नाही. त्यांनी अंगाला लावून घेऊ नये, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. भाजपने चिंता करु नये, त्यांनी काही केलं नाही तर घाबरु नये. कॅग रिपोर्ट आला म्हणून चौकशी”, असं त्यांनी नमूद केले आहे.

तर दुसरीकडे भाजप असे म्हणत आहे की पुरग्रस्त भागाचे पंचनामे न करता थेट मदत जाहीर करा. यावरी जयंत पाटील यांनी असे म्हटले आहे की, “भाजप सरकार असताना पंचनामे केल्याशिवाय कुणाला मदत केली नाही. अगदी घरं पडल्यावरदेखील पंचनाम्याशिवाय मदत झाली नाही. जे नुकसान झालं त्याची पाहणी केली पाहिजे, म्हणून पंचनामे करत आहोत. पंचनामे न करता कधीही मदत दिली नाही. अशी मदत दिली असा कोणाचा दावा असेल तर तो खोटा आहे. पडताळणी करून नेहमी तातडीची मदत देण्यात आली. कोल्हापूर- सांगलीत पूर आला तेव्हा सरकारच उशिरा आलं. लोकांनी स्वतःच्या ताकदीवर एकमेकांना मदत केली. नंतर शेवटच्या दोन तीन दिवसात लोकांना मदत मिळाली”.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य अत्यंत असंवेदनशील आहे. या कठीण समयी लोकांना तुम्ही काय मदत करता हे अपेक्षित आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे थिल्लरबाजी करणे त्यांना शोभत नाही. मोदीजी थेट लडाखला जातात, त्यामुळे उगाच स्वत:ची तुलना करु नये. आज मुख्यमंत्री थोडावेळ बाहेर पडले. काही तासांचा त्यांनी प्रवास केलाय, मोठी गोष्ट आहे. त्यामुळे इतर गोष्टी सोडून राज्य सरकार आता काय मदत करते याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. केंद्र सरकार मदत करेलच यात शंका नाही. मोदींनी स्वत फोन करुन त्यांना सांगितले की काही मदत लागली तर सांगा. मात्र अशा गंभीर दौऱ्यात अशा प्रकारचं थिल्लर वक्तव्य करणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कावेरी पाणी वाटपासाठी ३ मे रोजी सुप्रीम कोर्टाची पुढील सुनावणी

News Desk

फडणवीस नाही तर फसणवीस सरकारः खा. अशोक चव्हाण

News Desk

मुंबईसह राज्यभरात पुन्हा पावसाचा जोर

swarit