HW News Marathi
महाराष्ट्र

गीतेचा नवा अध्याय सुरु, जितेंद्र आव्हाड यांची फेसबुकवर पोस्ट

नागपूर | महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून महाविद्यालयात भगवद्गीता वाटप करण्याचा निर्णय मुंबई उच्च शिक्षण संचालन मंडळाने हे परीपत्रक काढलो होते. यात मुंबईतील मान्यात असणाऱ्या १०० महाविद्यालयात भगवद्गीता वाटपाचे आदेश देण्यात आले होते. या मुद्दयावरून विरोधकांनी शिक्षण विभागाला लक्ष्य केले असून शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आव्हाड यांची कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे प्रसार माध्यमांना बाईट देताना म्हटले होते की, ‘मला भगवद्गीता तोंडपाठ असून थेट गीतापठण सुरू केले होते. परंतु यदा यदा ही धर्मस्य ऐवजी यदा यदा सी धर्मस्य ग्लानिर्भवती भारत’, असे बोलून गेले आणि त्यांच्या लक्ष्यात ही गडबड आली. त्यानंतर चतुर्याने आव्हाडांनी विषय बदलण्याचा प्रयत्न केला. पण, एका रिपोर्टने त्यांची हा घोळ पकडला. त्यांनी तुम्ही थोडे श्लोक म्हणून दाखवा, आणि त्या प्रश्नांवर आव्हाड चिडले.

तसेच ‘तुम्ही भाजपाचे प्रवक्ते आहात का’, बाजूला या म्हणून दाखवतो, असे मुर्खासारखे प्रश्न विचारतात, या वाक्यावरून सोशल मीडीयावर आव्हाड ट्रोल होत आहेत. या नंतर आव्हाड यांनी सारवासारव करत आज फेसबुकवर त्यांनी एक भली मोठी पोस्ट शेअर केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ST कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर यावे, नाहीतर होणार कारवाई! – अनिल परब

Aprna

अनिल देशमुखांना १०० दिवस ED कस्टडी अन् जेलमध्ये रहावे लागेल- किरीट सोमय्या

News Desk

Bhima Koregaon : तेलतुंबडेंवरील गुन्हा रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

News Desk
महाराष्ट्र

‘कजरा मोहब्बतवाला’ कार्यक्रमाचे भारतीय विद्या भवनमध्ये आयोजन

News Desk

पुणे | ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’ च्या वतीने हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण काळातील गायिकांनी गायलेल्या ड्युएट म्हणजे युगूलगीतांच्या ‘कजरा मोहब्बतवाला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भारतीय विद्या भवन’ च्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह येथे शुक्रवारी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सांस्कृतिक प्रसार योजनेंतर्गत हा ५० वा, सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम आहे, अशी माहिती ‘भारतीय विद्या भवन’ चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. ‘सूर सखी’ संस्थेद्वारे हा कार्यक्रम सादर होणार आहे. ‘गाणी दोघींची-आवड सगळ्यांची’ अशी या कार्यक्रमामागची मध्यवर्ती कल्पना आहे.

कार्यक्रमाची निर्मिती मानिनी गुर्जर यांची असून संकल्पना ,निवेदन रंजना काळे यांचे आहे. मानिनी गुर्जर, अनुराधा पटवर्धन, देवयानी सहस्रबुद्धे गीते सादर करणार आहेत. संपदा देशपांडे, उमा जटार, किमया काणे, उर्मिला भालेराव, भावना टिकले, शिल्पा आपटे साथसंगत करणार आहेत. या कार्यक्रमात अनेक संगीतकारांच्या रचना सादर करण्यात येणार आहेत. कार्यक्रमांतर्गत साधारण १८ गीतांचे सादरीकरण होणार आहे.

Related posts

समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक! – चंद्रकांत पाटील

Aprna

‘महाविकास आघाडीत किती आलबेल हे त्यांच्या येरझाऱ्यांवरुनच दिसतंय’!

News Desk

‘एकनाथ शिंदे केवळ सही करणारे मंत्री’- नारायण राणे

News Desk