HW News Marathi
महाराष्ट्र

सकल मराठा समाजातर्फे उद्या मुंबई बंद

मुंबई | सकल मराठा समाजातर्फे ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. यामध्ये ठाणे, नवी मुंबई आणि नाशिकमध्ये बंद नसणार आहे. २५ जुलै रोजी झालेल्या मराठा आंदोलनाला नवी मुंबईत हिंसक वळण लागलं होतं. त्यात दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे नवी मुंबई परिसरात शांतता टिकून राहावी यासाठी नवी मुंबईमध्ये बंद राहणार नाही.

काल सांयकाळी शिवाजी मंदिर येथे झालेल्या सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. बंदसंदर्भात कोणतीही माघार घेतली नाही, संपूर्ण बंद हा शांततेच्या मार्गाने पार पडेल. मराठा क्रांती मोर्चा तर्फे उद्या होणाऱ्या राज्यव्यापी बंदबाबत निवेदन देण्यात आले आहे. मुंबईतही बंद होणार आहे पण तो शांततेच्या मार्गाने होणार असल्याचं म्हटलं आहे. सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंत हा बंद पुकारण्यात आला आहे. हिंसा न करण्याचं आवाहन सकल मराठा मोर्चाकडून करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा आणि शाळा, कॉलेज यांना बंदमधून वगळण्यात आलं आहे.

तसेच आरक्षणासाठी आत्महत्या करू नये, त्याने प्रश्न सुटणार नाही असं देखील संघटनेनं आवाहन केलं आहे. मराठासमाजाची मुंबई येथे बंद संदर्भात बैठक पार पडली. त्यानुसार महाराष्ट्रासह आता मुंबईतही बंद पुकारण्यात आला आहे. शांततेन हा बंद पुकारण्यात येईल. हा बंद कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही तर न्याय हक्कासाठी आहे. सगळ्या समाजाच्या लोकांनी सहकार्य करावं असं देखील आवाहन करण्यात आलं आहे. यासोबतच कुठल्याही शासकीय, खासगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. पोलिसांना सहकार्य करण्यात यावं असं देखील आवाहन यावेळी करण्यात आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अविनाश जाधवांना मलंगगडावर आरती करण्यापूर्वीच केली अटक, तरीही २७ एप्रिलला आरतीचा निर्धार

News Desk

चंद्रकांत पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका, रोहित पवारांचे ‘हे’ प्रत्युत्तर 

News Desk

जयंत पाटील बुद्धिमान माणूस, लाॅकडाऊनबाबत माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा सल्ला त्यांना घ्यावा वाटला नसेल !

News Desk