HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र भाजपमुक्त करायचा आहे – नाना पटोले

नागपूर | ‘महाराष्ट्र भाजपमुक्त करायचा आहे. आणि याची सुरुवात भंडारा-गोंदियामधूनच करुन आम्हाला हा संदेश द्याचा आहे, असे काँग्रसेचे नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही पोटनिवडणूक एक दिलाने लढवणार असल्याचे देखील पटोले यांनी सांगतले.

भंडारा-गोंदिया आणि पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला आहे. त्यानुसार या दोन्ही मतदारसंघात २८ मे रोजी मतदान होणार आहे, तर ३१ मे रोजी निकाल जाहीर होईल. ३ मे पासून निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरूवात होणार असून १० मे ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट 

News Desk

“हे समाजाचे “अ” कल्याण मंत्री”, पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्षपणे टीका!

News Desk

#Article370Abolished : आज देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले !

News Desk
महाराष्ट्र

भामरागड तालुक्यातील शंभर गावांचा जिल्हाशी संपर्क तुटला

News Desk

गडचिरोली | सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आला असून, पुलावरुन ३ फूट पाणी वाहू लागल्याने तालुक्यातील शंभर गावांचा संपर्क तुटला आहे.मागील पंधरा-वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता. धानपिकाची रोवणी केलेल्या शेतकऱ्यांना दुसऱ्या स्त्रोतामधून पाणी आणून पीक वाचविण्याची धडपड करावी लागली, तर ज्यांची रोवणी करावयाची होती, त्यांच्यापुढे दुष्काळाचे सावट उभे राहिले होते.

मात्र, परवा रात्रीपासून जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. काल रात्री सर्वत्र दमदार पाऊस पडला. भामरागड तालुक्यातील ताडगाव येथे सर्वाधिक २२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल भामरागड येथे २०७ मिलिमीटर, अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे १४७.४ मिलिमीटर, सिरोंचा तालुक्यातील बामणी येथे १३९ मिलिमीटर, एटापल्ली तालुक्यातील गट्टा येथे १२३.२ मिलिमीटर व कसनसूर येथे १२२.६ मिलिमीटर पाऊस पडला. भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरुन काल रात्री ३ फूट पाणी वाहत होते.

पहाटेला पूर ओसरला. परंतु आज सकाळी पुन्हा पुलावरुन पाणी वाहू लागले. हेमलकसा गावाच्या अलिकडे असलेल्या कुमरगुडा येथील नाल्यालाही पूर आला आहे. त्यामुळे त्या भागातील शंभर गावांचा संपर्क तुटला होता. सिरोंचा तालुक्यातील बामणी-टेकडाताला मार्गाचा संपर्क तुटला आहे. चामोर्शी तालुक्यातील दिना नदी, कुरखेड्यातील सती नदी, गडचिरोलीनजीकची कठाणी नदी, पोटफोडी नदी व आरमोरीनजीकची गाढवी नदी व अन्य नाले दुथडी भरुन वाहत आहेत. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

Related posts

आपत्कालीन परिस्थितीत शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून काम करा! – मुख्यमंत्री

Aprna

काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna