HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र बोलघेवड्यांचे राज्य नाही, जे बोलतो ते करुन दाखवतो, गुन्हेगारीवर मुख्यमंत्र्याचे वक्तव्य!

मुंबई। राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी उच्च प्रतीच्या सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. गुन्हेगाराने गुन्हा केल्यानंतर तो काय अयुध वापरणार याची अधिच कल्पना पोलिसांना आली पाहिजे अशा प्रकारची सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. महाराष्ट्र केवळ बोलघेवड्याचे राज्य नाही तर आम्ही जे बोलतो ते करुन दाखवतो असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. महाराष्ट्रातील वाढत्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी प्रयोगशाळांची मोठी मदत होणार आहे. प्रयोगशाळांमुळेच गुन्ह्यांना वाचा फुटणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यासाठी फॉरेन्सिक लॅब मदत करणार

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई, पुणे, नागपूरमधील फॉरेन्सिक लॅबचे उद्घाटन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वाढती गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार अशा गुन्ह्यांना वाचा फोडण्यासाठी या प्रयगोशाळा महत्त्वाचे काम करणार असल्याचे सांगितले. महिलांवर वाढते अत्याचार आणि मुलांवर वाढते अत्याचार, अनेक गुन्हे असे असतात त्याला वाचा फुटत नसते. कारण गुन्हेगाराची दहशत असते आणि अमुक केलंस तर असे करेल तसे करेल अशी धमकी दिली जाते यामुळे गुन्ह्यांना वाचा फुटणे फार महत्त्वाचे आहे. यासाठी फॉरेन्सिक लॅब मदत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

भोलघेवड्यांचे राज्य नाही तर आम्ही जे बोलतो ते करुन दाखवतो

अत्याचार केला तर पुरावा शोधणे हे अव्हानात्मक असते. काही पुरावा नसताना त्या गुन्ह्याला वाचा आणि गुन्हेगाराला शिक्षा या लॅबमुळे देता येणार आहे. शक्ती कायदा करायचा आहे आणि गुन्हेगारांवर वचक बसवायचा आहे परंतु त्या कायद्याला शक्ती देणाऱ्या सोयी सुविधा उभारत आहोत. कायद्याला बळकटी आणण्याचे पुरावे देण्याचे काम शोधण्याचे काम या प्रयोगशाळांच्या माध्यमातून होणार आहे. महाराष्ट्र हे केवळ भोलघेवड्यांचे राज्य नाही तर आम्ही जे बोलतो ते करुन दाखवतो आणि करुन दाखवणारच या जिद्दीने पुढे जाणारे हे राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अभिमान वाटले पाहिजे असे काम पोलिसांनी केलं

अमली पदार्थ याला फार पेव फुटले आहे. जणू काही सर्व जगातील अमली पदार्थ महाराष्ट्रातच मिळत आहेत. अशा पद्धतीने हे वातावरण तयार करण्यात येत आहे. ते पकडणारे सुद्धा विशेष असलेली टीमच ते काम करु शकते असे काही नाही. ४ दिवसांपुर्वी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने २५ कोटींचे हेरोईन पकडले आहे. पण फक्त हेरॉईन पकडले यात हेरोईन नव्हती यामुळे मुंबई पोलिसांचे कुठे नावच आले नाही. पण अभिमान वाटले पाहिजे असे काम पोलिसांनी केलं आहे. महाराष्ट्र पोलिसांचे दल हे मजबूत आहे. गुन्हेगारांना इकडे दया माया केली जात नाही. मागोवा घेऊन गुन्हेगारांना शिक्षा दिली जाते ही ख्याती आहे याला आता बदनाम करण्याचे हेतू दिसतो आहे तो मोडून तोडून काढला पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांतसिंग प्रकरणाचा तपास डॉ नरेंद्र दाभोळकरांसारखा होऊ नये, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

समीर वानखेडेंच्या चौकशीचे NCB महासंचालकांचे आदेश!

News Desk

अब्दुल सत्तार यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

swarit