HW News Marathi
महाराष्ट्र

गोव्यात फोन टॅपिंगचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’; संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (५ मार्च) पुन्हा एकदा भाजपवर मोठा आरोप केला आहे. संजय राऊत यांनी फोन टॅपिंग प्रकरणावरून मोठी खळबळ उडवून दिली आहे. गोव्यात फोन टॅपिंगचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’ सुरू झाला आहे. ज्यांच्यामुळे महाराष्ट्रात फोन टॅपिंग प्रकरण घडलं तेच गोव्यात निवडणुकीचे प्रभारी होते असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तेव्हा असेच माझे आणि एकनाथ खडसे यांच्यासारख्या नेत्यांचे दोन महिने फोन टॅप करण्यात आले. याबाबत काल मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, “देशातील विरोधी पक्षनेते असलेल्या अनेक नेत्यांचे फोन टॅप केले जात आहेत आणि विशेषत: जेथे निवडणुका होत आहेत. काल (4 मार्च) गोव्यातील काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट झाली आणि त्यांनी सांगितले की त्यांचा फोन टॅप होत असल्याचा त्यांना संशय आहे”, असे संजय राऊत म्हणाले. तसेच राऊत म्हणाले की केवळ दिगंबर कामतच नाही तर सुदिन ढवळीकर, विजय सरदेसाई या प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांचेही फोन टॅप होत आहेत.

गोव्यातील फोन टॅपिंग प्रकरणाशी संबंधित कोण आहे, असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला. यावर त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि गोव्यातील भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता सांगितले की, त्यावेळी फोन टॅपिंगचे काम कोणाच्या सूचनेवरून सुरू झाले, तेच सध्या गोव्यात निवडणूक प्रभारी आहेत. सर्व काही त्यांच्या इशाऱ्यावर होत आहे. जिथे जिथे निवडणुका होत आहेत, तिथे भाजप फोन टेपिंगचे काम करते”, असे राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले की “मला उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव यांची काळजी वाटते. देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा, राज्यपाल आणि घटनात्मक संस्थांचा कितीही राजकीय वापर केला, तरी भाजप केजीबी आणि सीआयएलाही आणू शकेल. मात्र, ते पुन्हा सत्तेत येणार नाही. देशातील जनता सर्व काही पाहत आहे”, असंही राऊत म्हणाले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘नुसती बोलाची कढी आणि बोलाचा भात’, केशव उपाध्येंचा राज्यसरकारला टोला

News Desk

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक मान खाली घालून जगू शकत नाही | सोने व्यापाऱ्याची आत्महत्या

News Desk

पालक व शिक्षण विभागाने सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका ठेवावी! – डॉ.नीलम गोऱ्हे

Aprna