HW News Marathi
महाराष्ट्र

आपल्या हातात सत्ता नाही म्हणून नैराश्येपोटी ते सरकारविरोधात हॅशटॅग ट्रेंड करतात !

सांगली | आपल्या हातात सत्ता नाही म्हणून काही लोके अस्वस्थ आहेत. नैराश्येपोटी ते सरकारविरोधात हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे लोकांमध्ये जावून काम करत आहेत. लोकांचा सरकारवर विश्वास आहे. त्यामुळे भाजपचे प्रयत्न व्यर्थ जाणार आहेत. सरकार खंबीर आहे, १५ वर्षे टिकणार, असे ट्वीट करत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे.

संकटाच्या काळात खांद्याला खांदा लावून काम करायचे असते. मात्र भाजपला ते जमत नाही. भाजप म्हणते आम्ही इतक्या लोकांना भोजनाची व्यवस्था केली मात्र प्रत्यक्षात तसे काही दिसले नाही. राज्याच्या तिजोरीत सध्या काहीच नाही. मार्चमध्ये लोकं मोठ्या प्रमाणात कर भरत असतात. मात्र, लॉकडाऊनमुळे लोकांना ते करता आले नाही. राज्याला आर्थिक चणचण भासणार. मात्र, महाराष्ट्र हे सक्षम राज्य आहे. महाविकासआघाडी सरकारच्या नेतृत्वात महाराष्ट्र या संकटाला तोंड देणार.

शासन राज्यातील ३ कोटी जनतेला स्वस्त दरात राशन उपलब्ध करून देणार आहे. मे व जून या पुढील दोन महिन्यासाठी राशन पुरवले जाणार आहे. ज्यासाठी शासन साडे चारशे कोटी रुपये खर्च करणार आहे. देशभरात सर्वात जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्याला सर्वात जास्त केंद्राच्या मदतीची गरज आहे पण तसे सहकार्य मिळत असल्याचे अनुभव नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मागण्यांचे जे पत्र लिहिले त्याला अजून उत्तर आलेले नाही. जिथे रुग्णांची संख्या कमी आहे तिथे लॉकडाऊन शिथिल करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. ग्रामीण भागात अर्थव्यवस्था सुरळीत करावी लागेल. ग्रामीण भागातील उत्पन्न वाढवावे लागेल. या सगळ्यातून बाहेर पडण्याची आपल्याला सुरुवात करावी लागेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालकमंत्री सतेज पाटील यांचा शब्द पडू देणार नाही अशी कामगिरी करू –  जयंत आसगावकर

News Desk

अर्थसंकल्प विधीमंडळात सादर होण्यापूर्वीच फुटला !

News Desk

मुंबईतून ईडी कार्यालयात जायचं म्हटलं की वय,आजारपण आठवायला लागले” भाजपची टीका

News Desk