HW News Marathi
महाराष्ट्र

अनेक आले आणि गेले, मात्र शिवसेना ५५ वर्षे कायम राहिली आणि राहणार !

मुंबई। शिवसेनेचा आज (१९ जून) ५५वा वर्धापनदिन असून, पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधणार आहे. यापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. बाळासाहेबांच्या विचाराने महाराष्ट्रात शिवसेना रुजली. सुरुवातीच्या काळात शिवसेना ५ ते ६ वर्षांतच बंद होईल, असं देखील म्हटलं जात होतं. देशात अनेक पक्ष आले आणि गेले. शिवसेना महाराष्ट्राची सीमा ओलांडून पुढे जात आहे. यापुढे दिल्लाच्या तख्तासंदर्भातही शिवसेनेची भूमिका महत्त्वाचीच राहील. शिवसेना आज ५५ वर्षांची झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर शिवसेना पोहचली. शिवसेना ५५ वर्षांची झाली. पक्ष कायम आहे आणि पुढेही कायम राहणार, असे संजय राऊत म्हणाले.

मराठी माणसाने आपली केली

पुढे राऊत म्हणाले, बाळासाहेबांच्या विचाराने शिवसेना अस्तित्वात आली आहे. हिंदुत्व हेच शिवसेनेचे ब्रीद वाक्य आहे. शिवसेनेला मराठी माणसाने आपली केली आहे. मराठी माणसाचा विषय शिवसेनेने कधीही दूर केलेला नाही. हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही विषय शिवसेनेसाठी महत्त्वाचे राहिले आहेत. आज हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हटलं की जगभरातल्या हिंदुंसमोर शिवसेनाच येते. शिवाय मराठी माणसाला आजही शिवसेनाच आपला आधार वाटते. आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. शिवसेना राष्ट्रीय स्तरावर पोहचली. शिवसेनेला केंद्रात महत्वाच्या स्थानावर न्यायाचे आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा… या ओळी बहुदा शिवसेनेच्या भविष्यासाठीच लिहिण्यात आल्या असाव्यात. येणाऱ्या काळात शिवसेना राष्ट्रीय राजकारणातही मुख्य भूमिका निभावणार आहे. त्यामुळेच आगामी काळात देशाच्या तख्तासंदर्भात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. शिवसेनेचा विचार महत्त्वाचा राहणार आहे. एक छोटं संघटन म्हणून शिवसेनेची सुरवात झाली. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारं हे संघटन आहे. भारताच्या राजकारणात शिवसेना हा मोठा चमत्कार आहे. शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण केलं आहे. त्यांच्याच विचारधारेवर शिवसेना पुढे जात आहे. आम्ही मराठी माणसाचा विषय कधीच सोडला नाही. त्यामुळे मराठी माणसाला शिवसेना आपली वाटते. हिंदुत्व आमि मराठी हे दोन विषय शिवसेनेसाठी महत्त्वाचे असून येणाऱ्या काळात शिवसेना ताऱ्या सारखी चमकत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या विषयावर बोलणं टाळलं

आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस असून शिवसेनेकडून त्यांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते स्वबळावर निवडणुका लढणार असल्याचे सांगत आहेत. मात्र आज राहुल गांधींचा वाढदिवस आणि शिवसेनेचा वर्धापनदिन असल्याने या विषयावर मी आज बोलणार नाही, असे म्हणत त्यांनी काँग्रेसबद्दल जास्त बोलण्याचे टाळले.

यावेळी त्यांनी दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावल्याची माहिती मला मिळाली. शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकैत यांच्याशी याबाबत मी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध! – मुख्यमंत्री

Aprna

दिलीप वळसे-पाटील अचानक ‘वर्षा’वर, राणेप्रकरणावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा?

News Desk

आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घ्यावी लागत नाही, फडणवीसांची पंढरपूरात फटकेबाजी!

News Desk