HW News Marathi
महाराष्ट्र

आधी चीन-अतिरेक्यांना उखडून फेका, मग महाविकासआघाडीकडे वळा!

मुंबई | अरुणाचल प्रदेशमध्ये चीन घुसलं आहे. चीननं आपल्या हद्दीत गाव बसवली आहेत. सर्वात आधी त्यांनी चीनला आपल्या हद्दीतून बाहेर फेकलं पाहिजं. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले वाढलं असून अतिरेक्याचं अड्डे वाढलं आहेत. सरकारनं राष्ट्रीय सुरक्षेसाठी अरुणाचलमधून चीनला आणि काश्मीरमध्ये अतिरेक्यांना या दोघांना उखडून झालं की, मग त्यांनी महाराष्ट्राकडे वळावं. आणि राजकीय उखडबाजी जी काही आहे जरूर करावी, असा टोला खासदार संजय राऊत यांनी भाजपचं पक्षाचं अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना लगावला आहे.

जे. पी. नड्डा सदगृहस्थ आणि चांगले नेते आहेत. ते म्हणाले की, महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचं सरकार उखडून फेका. त्याआधी त्यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये चीन जे घुसलं आहे आणि चीनने आपल्या हद्दीत गावं बसवली आहेत. त्यांनी सर्वात आधी अरुणाचल प्रदेशातून चीनला उखडून फेकलं पाहिजं. जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले वाढलं आहेत. अतिरेक्यांचं अड्डे वाढले आहेत. त्यांना ताबडतोब उखडून फेकलं पाहिजं, असा सल्ला राऊतांनी नड्डांना दिला आहे.

राऊत पुढे म्हणाले, राजकारणात लोकशाहीत एखादं सरकार लोकशाही मार्गाने हटविण्याचा अधिकार दुसऱ्या पक्षाला आहे. पण उखडण्याची भाषा करत असाल तर सीमेवर जी लोकं घुसली आहेत. आणि गावंच्या गावं बसवली आहेत. चीनने त्यांना उखडण्यासाठी काही करता येत असेल तर देश त्याविषयी समजून घ्यायला उत्सुक आहे, असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला आहे.

नोटाबंदी पूर्ण अपयशी ठरली

नोटाबंदीच्या घिसाडघाईबद्दल केंद्र सरकारने देशाची माफी मागायाला हवी, अशी मागणी राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. नोटा बंदीला आज (८ नोव्हेंब) पाच वर्षपूर्ण झाले आहे. यासंदर्भात माध्यमांनी बोलताना केंद्र सरकारवर बोचरी टीका राऊतांनी केली आहे. राऊत पुढे म्हणाले, आज पाच वर्षात काश्मीरमध्ये सर्वाधिक दहशतवाद वाढला आहे. याच पाच वर्षात देशात सर्वात जास्त काळापैसा वाढला आहे. यामुळे नोटाबंदी पूर्ण अपयशी ठरली आहे. नोटाबंदीचा हा निर्णय आर्थिक डिजास्टर होता. नोटाबंदी झाल्यावर शेकडो लोकांनी नोकऱ्या आणि प्राण गमवाला लागला होता. त्यामुळे नोटाबंदीच्या घिसडघाईबद्दल केंद्र सरकारने देशाची माफी मागायला हवी, असे राऊतांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

जे. पी. नड्डा नेमके काय म्हणाले

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर महावसुली आणि भ्रष्टाचारात सामील असल्याचा आरोप भाजप पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला आहे. नड्डा यांनी भाजपच्या दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत असे विधान केलं होते. महाविकास आघाडी सरकारवर महावसुली आणि भ्रष्टाचारात सामील असल्याचा आरोप केला. या सरकारला उखडून टाकून जनतेची सुटका कारयाची आहे, असे आवाहन नड्डांनी कार्यकर्त्यांना केलं.

 

 

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र सैनिक संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्री, जिल्हाधिकारी व उपनिबंधकाना निवेदन

News Desk

राज्यातील पूरस्थितीमुळे विरोधकांचा ईव्हीएमविरोधी मोर्चा पुढे ढकलला

News Desk

प्रत्येक निवडणुकीला चिन्ह बदलतच विजय मिळवत आलो आहे !

News Desk