HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईबाहेरच्या लसवंतांनाही रेल्वे प्रवासासाठी खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

मुंबई। कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या सामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. कोरोनाची दुसरी लाट येताच सामान्यांच्या लोकल प्रवासावर एप्रिल २०२१ पासून निर्बंध होते. मात्र आता दोन डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करता येत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने सोमवारपासूनच लोकल फेऱ्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईबाहेरच्या लस घेतलेल्या लोकांनाही रेल्वेने प्रवास करु द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मुंबईबाहेरच्या लोकांना लोकल प्रवासाची परवानगी मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विनंती केली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे.

 

 

 

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे.परंतु राज्यातील अनेक ठिकाणी नागरिकांना नोकरी-व्यवसाय,शिक्षण व इतर कारणांसाठी रेल्वेने प्रवास करावा लागतो.परंतु सध्या त्यांना परवानगी नसल्यामुळे त्यांची अडचण होत आहे. हे लक्षात घेता दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत कृपया सकारात्मक निर्णय घ्यावा ही नम्र विनंती, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीड जिल्ह्यातील १०७८ गावांमधील पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करा! – गुलाबराव पाटील

Aprna

…तर अजित पवार म्हणाले, आणि रोहित पवारांनी देखील केंद्राकडून केली मदतीची अपेक्षा!

News Desk

डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर

News Desk