HW News Marathi
महाराष्ट्र

मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील पदार्थ घेऊन जाता येणार

नागपूर | मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहायला जाणाऱ्यांना बाहेरील पदार्थ नेण्यास कोणीही अडवू शकत नाही. कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तर, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविद्र चव्हाण यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहायला जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुढे मल्टिप्लेक्समधील महागडे पदार्थ घेण्याची गरज भासणार नाही. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बाहेरचे पदार्थ देखील मल्टिप्लेक्समध्ये नेता येणार आहे.

विधानपरिषधेतचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मल्टिप्लेक्स, महामार्गातवरील फुडमॉल व मॉलमध्ये बाहेरील खाद्यपदार्थ खाण्यास घालण्यात येणारी बंदी आणि त्यांचाकडील अव्वाच्या सव्वा किंमतीने खाद्यपदार्थांचीव विक्रीकडे सरकारचे लक्ष वेधले होते. मुंडे यांच्या प्रश्नांचे उत्तर देताना मल्टिप्लेक्सच्या विरोधात राज्य सरकारने निर्णय घेतला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

गेल्या महिन्याभरापुर्वी मल्टिप्लेक्सच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिनेमागृहाच्या व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर असलेल्या पीव्हीआरमध्ये या सिनेमागृहात ५ रुपयांचे पॉपकॉर्न २५० रुपयांना का विकता अशी विचारणा करत मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यात मनसेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी आणि पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदूक ठेवत शिवसेनेवर हल्ले, राऊतांचा आरोप

Aprna

काँग्रेस १२ मेपासून करणार राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा

News Desk

भिवंडीत ३ मजली इमारत कोसळली २० जणांना बाहेर काढले तर १० जणांचा मृत्यू

News Desk
मुंबई

येत्या ४८ तासात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा

News Desk

मुंबई | येत्या ४८ तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हवामान खात्याने दोन दिवस रेड अलर्ट जारी केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १४ व १५ जुलैला मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गेल्या शनिवारपासून ते मंगळवारपर्यंत पावसाने मुंबईसह उपनगराला चांगलेच झोडपून काढले होते. त्यानंतर पावसाने बुधवारपासून विश्रांती घेतली आहे. परंतु पुन्हा वरुण राजाचे आगमन होणार आहे. १४ आणि १५ जुलैला मुसळधार पाऊस त्यांची पूर्वतयारी मुंबई महापालिकेने करणे गरजेचे आहे.

येत्या ४८ तासात मुंबई शहरात, उपनगरात, ठाणे पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदर्ग या सर्व भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारी सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत.

Related posts

जखमी गोविंदांची सांस्कृतिक मंत्र्यांनी घेतली भेट

swarit

गिरीश बापट यांच्या शासकीय बंगल्याला भीषण आग

News Desk

शिवाजी पार्कमध्ये अवतरणार साईंची शिर्डी

News Desk