HW News Marathi
महाराष्ट्र

“मुंबईकर आता कायदेभंग करतील”, भाजपाचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबई | मुंबईमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत आहे. तसंच लसीकरणाला वेग आलं असून देशातल्या अनेक नागरिकांचं लसीकरण संपूर्ण झालं आहे. सरकारने अजूनही सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दिलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागत असताना यावरून भाजपानं राज्यातील ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

नागरिकांकडून नियमांचं उल्लंघन

केंद्र सरकारने लोकल सेवा सुरु करण्याची परवानगी खूप आधी दिली असली तरी,राज्य सरकार कडून अजून काहीच निर्णय समोर येत नाही आहे. “मुंबईतील सामान्य नोकरदार, कष्टकऱ्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी न देणाऱ्या ठाकरे सरकारला धडा शिकवण्यासाठी सामान्य मुंबईकर २ ऑगस्ट पासून सविनय नियमभंग करीत लोकल प्रवास सुरु करतील”, असा इशारा भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी दिला. “मुंबईतील प्रवासाच्या सुविधेबाबत ठाकरे सरकारकडे धोरण नसल्याने सामान्य माणसाचे अतोनात हाल होत आहेत”, असं देखील ते म्हणाले आहेत.

“महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नसल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनेच न्यायालयात दिले असल्याने आघाडी सरकारचा खोटेपणा पुन्हा उघड झाला आहे. केंद्र सरकार ऑक्सीजनचा पुरेसा पुरवठा करत नसल्याचे आरोप मुख्यमंत्री व आघाडी सरकारमधील काही मंत्री करत होते. आता न्यायालयात दिलेल्या शपथपत्रामुळे या सरकारने आपल्या खोटेपणाची कबुली दिल्याचेही केशव उपाध्ये यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

Aprna

भारतीय पोलिस जगातील सर्वोत्कृष्ट;त्यांच्या देशभक्ती, कर्तव्यनिष्ठेचा आम्हाला अभिमान-अजित पवार

News Desk

शरद पवारांनी गोपिनाथ मुंडेंना भाजप ‘न’ सोडण्याचा सल्ला दिला होता !

Arati More