HW News Marathi
महाराष्ट्र

“हे सोयीचं राजकारण…”, शरद पवारांच्या टीकेवर नारायण राणेंची प्रतिक्रिया

मुंबई। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षावर टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे. अनेक राजकारण्यांनी यावर टीका देखील केली आहे. याच मुद्यावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही शरद पवारांवर टीका केली आहे. ‘हे सोयीचं राजकारण असून आदर्श राजकारणी म्हणणार नाही’ अशा शब्दांत टीका केली आहे.

हे सोयीचं राजकारण

नारायण राणे यांनी शरद पवारांच्या टाके वरून त्यांना सुनावलं आहे. “शरद पवार कधी काय बोलतील….एका बाजूला काँग्रेसवर टीका करायची आणि दुसरीकडे त्यांना सोबत घेऊन सरकार चालवायचं. हा प्रकार काय आदर्श राजकारणी म्हणणार नाही. हे सोयीचं राजकारण आहे,” अशी टीका नारायण राणेंनी केली आहे.

काय म्हणाले शरद पवार?

आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झालीय. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं हिरवंगार शिवार माझं होतं, असं सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची झालीय.” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. तसेच, विरोधी पक्षांमध्ये पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावरून मतभेद आहेत. काँग्रेची नेतेमंडळी राहुल गांधी हे विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाचा चेहरा होऊ शकतात, असं ते म्हणाले होते.

‘मुंबई तक’शी पवारांनी काँग्रेसला हे खडे बोल सुनावले. इंडिया टुडे ग्रुपचं मराठी डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या ‘मुंबई तक’च्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त पवारांची दीर्घ मुलाखत घेण्यात आली. राजदीप सरदेसाई आणि साहिल जोशी यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्र तसंच देशभरातल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. ठाकरे सरकार किती वर्ष चालणार, देशात महाराष्ट्राचा प्रयोग होणार का या प्रश्नांसोबतच त्यांनी काँग्रेसच्या सद्यस्थितीवर परखड भाष्य केलं होतं.

सुबुद्धी सरकारलाही लाभू देत

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. शरद पवार यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. याआधी देखील महाविकास आघाडी सरकारच्या पक्षांमध्ये कुरघोडी सूर होतीच, त्यात आता अजून भर पडली आहे. शरद पवार यांनी काँग्रेस पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी काँग्रेसवर टीका केल्यावर आता राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. अनेक राजकारणी यावर आपलं मत देत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मंदिरं न उघडण्याच्या सरकारच्या निर्णयावर देखील निशाणा साधला. “मंदिरं सुरू करण्याची आमची मागणी आहे. आम्ही हिंदू आहोत. आमचे ३३ कोटी देव आहेत. जिथे आम्ही मानू, तिथे आमचे देव आहेत. पण या मंदिरांवर अवलंबून असणारे लाखो लोक आहेत. कुणी फुलं विकतं, कुणी उदबत्ती विकतं, कुणी प्रसाद विकतं, हळद-कुंकू विकतंय. मंदिरांवर अवलंबून असणारे पुजारी, सेवक आहेत. गेल्या दोन वर्षांत या लोकांची विदीर्ण अशी अवस्था झाली आहे. म्हणून आम्ही मागणी केली की मदिरालय सुरू होऊ शकतं, तर मंदिरं का सुरू होऊ शकत नाहीत? सोशल डिस्टन्सिंगचे नियम नक्कीच पाळले जावेत. देशभरात सर्व राज्यांमध्ये मंदिरं सुरू आहेत, फक्त महाराष्ट्रात मंदिरं बंद आहेत. त्यामुळे सगळ्यांना गणरायांनी सुबुद्धी द्यावी, तशी सुबुद्धी सरकारलाही लाभू देत”, असं फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वातंत्र्याची व्याख्या सोयीनुसार बदलली आहे, सामनातून भाजपवर रोख

News Desk

गोपीचंद पडळकर आज भाजपमध्ये, काँग्रेसच्या ६ आमदारांचा प्रवेश लांबणीवर

News Desk

विखे येताच विरोधकांकडून ‘आयाराम गयाराम जय श्रीराम’च्या घोषणा

News Desk