HW News Marathi
महाराष्ट्र

‘विरोधकांचे दावे संजय राऊतांनी लावले फेटाळून’! म्हणाले….

मुंबई। शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नेहमीच विरोधकांवर साडेत्तोड उत्तर देत असतात. ठाकरे सरकार केव्हाही कोसळेल अशा वावड्या विरोधकांकडून वारंवार उठवल्या जात आहेत. विरोधकांचे हे दावे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फेटाळून लावले आहेत. ठाकरे सरकार स्थिर आहे. आम्ही इंचभरही हे सरकार हलू देणार नाही. याची विरोधकांनाही मनोमन खात्री पटली आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

त्यांना सरकार हलवता येणार नाही

संजय राऊत यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. वाद-विवाद कसले आहेत. मला तर काही वाद विवाद दिसत नाही. सरकार अस्थिर आहेत असं काही मोजके लोकं म्हणत आहेत. त्यांच्या मनातील भीती आणि वैफल्य ते बोलून दाखवत आहेत. जेव्हा ते वारंवार म्हणतात सरकार अस्थिर आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांना सरकार हलवता येणार नाही. ते पक्कं आणि स्थिर आहे. राज्यातील जे प्रमुख विरोधी पक्षाचे नेते आहेत, त्यांनाही मनोमन खात्री पटली आहे की काही झालं तरी पुढील तीन वर्षे हे सरकार अजिबात इंचभर सुद्धा इकडे तिकडे हलणार नाही आणि आम्ही सुद्धा हलू देणार नाही, असं राऊतांनी स्पष्ट केलं आहे.

या निर्बंधांचं पालन करायला हवं

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना जरी दिसत असली तरीदेखील राज्यात ९ दिवसांसाठी जमावबंदी करण्यात आली आहे. या वर्षीही आम्ही अत्यंत साधेपणाने गर्दी न करता हा ऊत्सव साजरा केला. अलिबागला तर लोक कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळत आहेत. उत्साह मनात असतोच. मी अलिबागला गणपतीसाठी गेलो होतो. तिथे पाहिलं की लोकांनी घरातच गणेशोत्सव साजरा केला. गर्दीवर निर्बंध आहेत. लोकांना जमण्यावर निर्बंध आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत, केंद्राच्या गाईडलाईन्स आहेत, त्यामुळे या निर्बंधांचं पालन करायला हवं, असं राऊत यांनी सांगितलं आहे.

जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे

उत्सवाबाबत मागणी होत असते, केरळमध्येही ओनमवेळी लोक कोरोना संक्रमित झाले. 30 ते 35 हजार लोक संक्रमित होत आहेत. महाराष्ट्रावर ही वेळ येऊ नये. त्यामुळे विरोधकांनी मागणी करताना जनतेच्या हिताची आणि आरोग्याची काळजी घेतली पाहीजे, असंही ते म्हणाले आहेत.

राजकारणात केवळ विरोधासाठी नाही

सण-उत्सव करण्यासाठी माणसे जगली पाहीजेत. त्यांचे आरोग्य नीट राहिलं पाहिजे. राजकारणारत आहोत हे केवळ विरोध करण्यासाठी नाही तर लोकांची काळजी करण्यासाठी आहोत. त्यांचा जीव जपण्यासाठी आहोत. हे विरोधकांनी लक्षात घेतलं पाहीजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भांडवलदारांना शेती व्यवसायात चंचू प्रवेश करू द्यायचा कट पंतप्रधानांनी रचलाय ! | जयंत पाटील

News Desk

प्रिया दत्त काँग्रेसच्या सचिव पदावरून पाय उतार

swarit

उद्धवजी बाळासाहेबांच्या प्रेरणेनेच मी सिंधुदुर्गाचा विकास केला – नारायण राणे

News Desk