HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणे थेट उच्च न्यायालयात जाणार!

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांविरोधात दिलेल्या वक्तव्यामुळे राजकारणात वातावरण चांगलंच पेटलं आहे. शिवसेनेने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, नाशिक पोलिसांनी अटकेचे आदेश दिले आहेत. याचे पडसाद आता राजकीय वातावरणात दिसून येतोय. केंद्रीय मंत्री नारायण राणे आता थेट उच्च न्यायालयात जाणार आहेत. त्यांनी त्यांचे वकील संजय चिटणीस यांच्याशी बातचीत केली आहे.

नारायण राणे थेट उच्च न्यायालयात

“मुख्यमंत्रीच्या कानशिलात लगावली असती”, असं वक्त्याव केल्याने महाराष्ट्रात त्याचे पडसाद दिसू लागले आहेत. नारायण राणे आता अटकपूर्व जामिनासाठी थेट उच्च न्यायालयात पोहोचले आहेत. त्यांचे वकील संजय चिटणीस यांच्याशी बातचीत करून त्यांनी आता थेट अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात पोहोचले आहेत.

काय आहे प्रकार?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द काढल्याने युवासेनेने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. कारण, नारायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येणार आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता नाशिक पोलिसांचे पथक नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणच्या दिशेने रवाना झाले आहे. नारायण राणे सध्या परशुराम घाटातील ग्रीन रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. नाशिक पोलिसांचे पथक येथूनच नारायण राणे यांना ताब्यात घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता राणे समर्थक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

नारायण राणेंवर गुन्हा दाखल

नाशिक सायबर पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे यांच्याविरोधात कलम 500, 505 (2), 153-ब (1) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांबाबत बदनामीकारक वक्तव्य करणे, समाजात शत्रुत्व आणि द्वेषाची भावना निर्माण करणे, राज्यात विविध गटांत तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करणे, मुख्यमंत्र्यांवर बलप्रयोग करण्यास प्रवृत्त होतील असे वक्तव्य करणे यासारखे आरोप राणेंवर ठेवण्यात आले आहेत. गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्यापकता लक्षात घेत अटक करण्यासाठी पोलिसांची टीम तयार आहे. नाशिक पोलीस उपायुक्त संजय बरकुंड, तपास अधिकारी आनंदा वाघ यांच्या अध्यक्षतेत टीम कारवाई करणार आहे.

काय म्हणाले नारायण राणे?

मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती

राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात ‘सावरकर वाद’ ओढावून राहुल गांधींनी काय साधलं?

Manasi Devkar

चांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार

Aprna

मेट्रो कारशेडला विरोध: प्रकाश आंबेडकरांनी स्वत:ला अटक करून घेतली

News Desk