HW News Marathi
महाराष्ट्र

नागरीकांना छळण्यासाठी NCB चा वापर होतोय! – जयंत पाटील

रत्नागिरी | “नवाब मलिक हे एनसीबीच्या विरोधात पुराव्यानिशी बोलत आहेत. या प्रकरणात नागरीकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी व अनेक दिवस तुरुंगात ठेवण्यासाठी एनसीबीचा वापर होतोय”, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज (२८ ऑक्टोबर) दापोली येथे पत्रकार परिषदेत केला. “शाहरुख खानच्या मुलाच्या बाबतीत घडलंय आणखी इतरांच्या बाबतीतही झालं असेल त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी”, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.

“एनसीबीची टीम समीर वानखेडेच्या चौकशीसाठी आलीय. समीर वानखेडे याने घेतलेला दाखला व IRS मध्ये जो प्रवेश घेतला तो कोणत्या जातीच्या आधारावर घेतला याचं गणित लवकरच कळेल. फसवणूक कुणी केली व कशी केली? याचा खुलासा देखील लवकरच होईल. चौकशीसाठी आलेली एनसीबीची टीम ख-या गोष्टींची चौकशी करेल. त्यामुळे ही टिम चुकांवर पांघरूण घालण्यासाठी आली नसावी”, असा टोला देखील यावेळी जयंत पाटील यांनी लगावला आहे.

नवाब मलिक सत्य समोर आणतायत!

“नवाब मलिक ज्या गोष्टी समोर आणत आहेत त्यात सत्य आहे. केंद्राच्या या यंत्रणा चुका करुन दिशाभूल करत आहेत. या यंत्रणांचा वापर करून नागरिकांना छळण्याचा प्रकार होतोय”, असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले; तणावाचे वातावरण

News Desk

बुलडाणा जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्पांना गती द्यावी, जयंत पाटील यांचे निर्देश 

Aprna

बाळासाहेबांनी सांगितलेल्या विचारांवर आणि विधानांवरच शिवसेना चालतेय, शिवसेनेचे फडणवीसांना प्रत्युत्तर 

News Desk