HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीकडून राज्यातील पूरग्रस्तांना ५० लाख रुपयांची मदत जाहीर

मुंबई | राष्ट्रवादीकडून राज्यातील पूरग्रस्तांना ५० लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार-आमदार आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. या सर्व खासदार आणि आमदारांच्या पगाराची एकूण रक्कम ५० लाख इतकी असेल. संपूर्ण राज्यभरात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा भागात निर्माण झालेल्या भीषण पुरस्थितीमुळे येथील नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत.

राज्यात निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अजूनही अनेकजण या पुरात अडकून पडले आहेत. दरम्यान, या भीषण स्थितीच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे. “राष्ट्रवादीच्या वेल्फेअर संघातर्फे पहिला ट्रक ९ ऑगस्ट रोजी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जाणार आहे. त्यामध्ये औषधे, कपडे, बिस्कीटे असणार आहेत. इस्लामपूरमध्ये जवळपास ७२ हजार नागरिकांसाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. त्यांना लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा पुरवल्या जात आहेत”, असेही नवाब मलिक यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मला बदनाम करण्यासाठी हे केलं असावं”, रक्षा खडसे यांची ‘त्या’ प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया 

News Desk

राजगृहाला २४ तास संरक्षण देण्याचा राज्यसरकारचा निर्णय

News Desk

राष्ट्राचे नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता सध्या कुणामध्ये असेल तर ती शरद पवारांकडे – संजय राऊत 

News Desk