HW News Marathi
महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा ५०-५० चा फॉर्म्युला

मुंबई | लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी काल (१६ जुलै) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांची बैठक मुंबइ इथे पार पडली.

या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती मिळली आहे. यात राष्ट्रवादीकडून विधानसभेसाठी दोन्ही पक्षांनी ५०-५० चा फॉर्म्युला वापर करून निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. महाराष्ट्रात आघाडी करताना जागावाटपात याआधी राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस नेहमीच वरचढ राहिली आहे. परंतु आता चित्र बदलले असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. कारण मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची कामगिरी काँग्रेसच्या तुलनेत उजवी ठरली आहे. याचाच दाखला देत आता राष्ट्रवादीने ५०-५० चा फॉर्म्युल्यावर जोर देत आहे.

तसेच काँग्रेसने मात्र, जागावाटबाबत नवा प्रस्ताव राष्ट्रवादीसमोर ठेवला आहे. मागील निवडणुकीत ज्या जागा काँग्रेसने जिंकलेल्या त्या-त्या जागा पक्षाकडे राहतील. तसेच ज्या जागांवर जो पक्ष दुसऱ्या नंबरवर होता. ती जागा त्या पक्षाकडे घेतली, असा काँग्रेसचा प्रस्ताव आहे. काँग्रेसच्या या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसच्या वाट्याला १०६ आणि राष्ट्रवादीकडे ९५ जागा जातील. तर उरलेल्या ८७ जागांच्या वाटपावर मित्रपक्षांसह चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

थकबाकीची रक्कम भरल्यास शेतकऱ्यांना ५० टक्के वीजबिल माफी मिळणार 

News Desk

पीएमजीपी वसाहतीतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा निर्णय येत्या महिनाभरात! -मंत्री जितेंद्र आव्हाड

Aprna

मराठा आरक्षणप्रकरणी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात गृहमंत्र्यांनी घेतला आढावा

Aprna