HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे !

मुंबई | “पीक विम्यासंदर्भात राज्यातील विमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढून शिवसेना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे”, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. मंगळवारी (१६ जुलै) शिवसेनेमार्फत जो मोर्चा काढण्यात आला त्यात फक्त शिवसैनिक होते. महाराष्ट्रातील शेतकरी कुठे होते ?, असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

“महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पिळवणूक ज्या विमा कंपन्यांनी केली आहे त्यावर तोडगा निघू शकतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. परंतु सरकारची मर्जी दिसत नाही. दुर्दैवाने सत्तेतील एक पक्ष विरोधी पक्षाची भूमिका घेऊन श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे” अशी जोरदार टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे.

“केवळ मोर्चा काढून शिवसेनेला हात झटकता येणार नाहीत. सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी निर्णय घ्यायचे असतात. रस्त्यावर उतरून मोर्चे काढायचे नसतात हे शिवसेनेला कुणी तरी सांगायची गरज आहे”, असा टोला देखील जयंत पाटील यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्रकारावर हल्ला केल्यास तीन वर्ष शिक्षा-विधेयक मंजूर

News Desk

प्लास्टिक बंदीमुळे खवय्यांच्या तोंडचे पाणी पळाले

swarit

कोल्हापूर देशातील तिसरे केरोसिनमुक्त शहर

News Desk