HW News Marathi
महाराष्ट्र

जयंत पाटील हे अनिल देशमुखांच्या घरचे वॉचमन आहेत का?, निलेश राणेंची घणाघाती टीका

रत्नागिरी | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि इतर १० ठिकाणी सीबीआयने काल (२४ एप्रिल) छापे मारले होते. सीबीयाच्या या धाडीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सीबीआय देशमुखांच्या घरी बाहेरून कागदपत्रे घेऊन गेली होती, असा गंभीर आरोप केला आहे. जयंत पाटलांच्या या आरोपाचा भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी समाचार घेतला आहे.

निलेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली आहे. जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? ज्यांचं घर आहे, जे त्या घरात राहत आहेत. ते आरोप करत नाहीत आणि ज्यांचा घराशी काहीच संबंध नाही, ते आरोप करत आहेत. बरं घरात कोण जातं आणि कोण येतं हे वॉचमनशिवाय कोण सांगू शकतो, त्यामुळे पाटील यांना ही माहिती असल्याने कदाचित ते देशमुखांच्या घरचे वॉचमन असावेत, असा टोला राणे यांनी लगावला. जयंत पाटलांनी डोकं लावून बोलावं. तुम्हाला हे शोभत नाही, असं सांगतानाच परमबीर सिंग यांना त्यावेळी मांडीवर घेऊन बसला होता. आता ते व्हिलन झाले आहेत काय? असा खरमरीत सवालही त्यांनी केला आहे.

देशमुखांची चौकशी व्हावी हे न्यायालयाला वाटले. त्यामुळेच न्यायालयाने सीबीआयमार्फत चौकशीचे आदेश दिले. त्यात महाविकास आघाडीच्या पोटात दुखायचे कारण काय? तुमचे हात साफ असतील तर सुटाल, असं सांगतानाच राष्ट्रवादीच एवढी बैचेनी का वाढली आहे हेच कळत नाही. उद्या आपलंही नाव येईल म्हणून राष्ट्रवादीवाले बिथरले आहेत. चौकशी झाली तर कुठपर्यंत नावं जातील याची त्यांना भीती वाटतेय. त्यामुळेच राष्ट्रवादीला चौकशी होऊ नये असं वाटतं, असा दावाही निलेश राणे यांनी केला आहे.

यावेळी निलेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या चौकशीच्या मागणीचा पुनरुच्चार केला. अनिल परब मातोश्रीचे एजंट आहेत. ते या गुन्ह्यात भागीदार आहेत. परब मातोश्रीला पैसे पोहोचवत होते. मातोश्री सुद्धा या गुन्ह्यात आहे. परब हे पाईपलाईनमध्ये आहेत. ते सुटू शकत नाहीत, असं ते म्हणाले आहेत.

निलेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊतांवरही टीका केली आहे. राऊतांना केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केल्याशिवया पगार मिळत नाही. राऊतांविरोधात एका महिलेने तक्रार केली आहे. अनेक महिन्यांपासून ही महिला न्याय मागत आहे. त्यांच्याकडे राऊतांविरोधात पुरावे आहेत. मग कारवाई का होत नाही? असा सवाल त्यांनी केला. एका महिलेला छळणारा व्यक्ती ताठमानेने फिरू कसा शकतो? त्यांना अटक झालीच पाहिजे, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज काय बंद आहे?

News Desk

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्येक घोटाळ्याला क्लिन चिट | धनंजय मुंडे

News Desk

कृषी विधेयक संमत होताना महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून का बसले ? मनसेचा सवाल

News Desk