HW News Marathi
महाराष्ट्र

पवारांच्या नादाला लागून हिंदू धर्माची टिंगल उडवता, लोकंच तुम्हाला रस्त्यावर तुडवतील !

मुंबई | देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जारी केला आणि त्यात लाखो लोकं बेरोजगार झाले. त्यामुळे लोकं आणखी बेजार होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा मागतील अशी टीका सामनातून संजय राऊत यांनी आज केली. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.

‘पवार साहेबांच्या नादी लागून अजून किती हिंदू धर्माला डिवचणार रे संज्या. ह्या लोकांची हरामखोरी इतकी वाढली आहे की आता हिंदू धर्माची टिंगल उडवायला लागले. संज्या वेळ लांब नाही की तुला रस्त्यावरती लोकचं तुडवतील एक दिवस’, अशा खोचक शब्दांत त्यांनी संजय राऊत यांच्यावर वार केला आहे.

 

भाजपच्या एक नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सांगितले, रोज एकाग्रतेने हनुमान चालिसा पठण केल्याने कोरोनासह सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल. (40 कोटी लोकांनी रोजगार गमावला. त्यांना काम मिळेल काय?) आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीर केले, आता महाराष्ट्रात स्वबळावरच सत्ता आणू’ असं काही करण्यात आले आहे. पण संकटावर कुणी बोलत नाही. भूक, बेरोजगारीवर कुणी तळमळ व्यक्त करताना दिसत नाही. ‘संकट हीच संधी’ अशी वाक्ये तोंडावर फेकणे सोपे आहे, पण लोक संकटाशी कसे मुकाबला करीत आहेत हे कुणालाच माहीत नाही’ असे म्हणत राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तिसऱ्या लाटेसाठी राज्याची पूर्ण तयारी! तर ‘ते’ पत्र कधीचं, राजेश टोपेंकडून खुलासा!

News Desk

सामान्य माणसाला न्याय हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य; सामाजिक सौहार्द टिकविण्यावर भर द्या! – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Aprna

दहीहंडी समन्वय समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Aprna