HW News Marathi
Covid-19

दौंड-पुणे लोहमार्गावर प्रसंगावधान राखून मोठी दुर्घटना टाळल्याबद्दल, सुप्रिया सुळेंनी केले कौतुक

मुंबई | औरंगाबाद येथे मालगाडीच्या खाली चिरडून श्रमिकांचा दुर्देैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या रेल्वे अपघातात रेल्वे ट्रॅकवर झोपलेल्या १६ मजुरांचा मालगाडीने धडक दिल्याने मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच दुसऱ्या बाजुला “दौंड-पुणे लोहमार्गावर प्रसंगावधान राखून चालकाने वेळीच मालगाडी रोखली. यामुळे रेल्वेरुळावरुन चालत निघालेल्या २४ जणांचे प्राण वाचले. प्रसंगावधान राखून मोठी दुर्घटना टाळल्याबद्दल गाडीचे चालक गाडीचे चालक मुरलीधर तिवारी व त्यांचे सहायक आनंद कुमार यांचे कौतुक वाटते,” असे ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रसंगाची माहिती दिली आहे.

दौंड-पुणे लोहमार्गावरील उरूळी कांचन व लोणी काळभोर रेल्वे स्थानकादम्यान ८ मे रोजी सायंकाळी ७ वाजून १० मिनिटाच्या वेळी हा प्रकार घडला होता. मालगाडी दौंडवरून पुण्याच्या दिशेने मार्गक्रमन करत होते. ज्या मार्गाने मालगाडी जात होतो. त्या मार्गावर २४ मंजूर कुटुंबिय देखील रुळावरून चालत होते. मालगाडीचे चालक मुरलीधर तिवारी यांनी मंजुरांना पाहून हॉर्न वाजला होता. मात्र, मुरलीधर तिवारी व त्यांचे सहायक आनंद कुमार यांनी प्रसंगावधान राखत आपात्कालीन ब्रेक दाबला. यामुळे मंजुरांच्या १०० मीटर अगोदर मालगाडी थांबली.

या प्रकाराची माहिती उरूळी कांचन रेल्वे स्थानकावर देण्यात आल्यानंतर ही माहिती संबंधित अधिकाऱ्यांना कळवण्यात आली. औरंगाबादमधील रेल्वे अपघातात १६ मंजुरांचा मृत्यू झाला होता. याचवेळी दौंड-पुणे लोहमार्गावर अपघात टाळल्याने रेल्वे प्रशासानाने मुरली तिवारी आणि आनंद कुमार यांचा गौरव केला आहे.

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात काल ८,३६९ नवे रुग्ण आढळले, तर २४६ जणांचा झाला मृत्यू

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे

News Desk

ठाकरे सरकारकडून ‘दिवाळी’साठीच्या मार्गदर्शक सूचना जारी, कशावर बंदी ? जाणून घ्या

News Desk