HW News Marathi
Covid-19

कोरोनाच्या संकटाचा सामना करायला सरकार तयार, पण…

मुंबई | राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना काळजी घेण्याचे, सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शासन संकटाचा सामना करण्यासाठी तयार आहेच, पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे हे सर्वानी लक्षात ठेवावं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

राज्यातील कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा येथे बैठकीत आढावा घेतला. तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशी देखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केलं. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. या संपूर्ण काळात सर्व महत्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. या काळात मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करीत होती. आता देखील मिशन बिगिन अगेनमध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणं आपली जबाबदारी आहे, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

मी २ दिवसांपूर्वीच माझ्या सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे सांगितलं. हे याचसाठी सांगितलं कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही मुंबईकरांना लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. लोकांना काळजी घेण्यास सांगितले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुढील काळातील लॉकडाऊनमधली आव्हाने, अर्थचक्र गतिमान करणे यावर मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

News Desk

राज्य सरकारने पुणे महानगरपालिकेला आर्थिक मदत द्यावी !

News Desk

विरोधकांना कामधंदा नाहीय, जुनी गोष्ट उकरून काढतायत ! अजित पवारांची टीका

News Desk