HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधानांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन, मुंबईतील पावसावर झाली चर्चा

मुंबई | काल (५ ऑगस्ट) राज्यात मुंबईसह अनेक उपनगरात मुसळधार पाऊस झाला. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला होता. मुंबईतल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. केंद्र सरकार सर्वतोपरी राज्य सरकारला मदत करेल, अशी आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले आणि काळजी घेण्यास देखील सांगितले.

 

मुंबईमध्ये काल एका दिवसात विक्रमी पावसाची नोंद झाली. आज आत्तापर्यंत कुलाब्याला २९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी १० ऑगस्ट १९९८ ला २६१ मिमी पावसाची नोंद झाली होती, त्याचा विक्रम पावसानं आज मोडून काढलाय. मस्जिद रेल्वे स्थानकात अडकलेल्या २९० प्रवाशांची एनडीआरएफने सुखरुप सुटका केली आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय हॉकी संघाचं दमदार पुनरागमन, स्पेनचा ३-० ने पराभव!

News Desk

रक्षा खडसेंचा मोदी सरकारला घरचा आहेर ! खतांच्या किमती कमी करण्यासाठी पत्र

News Desk

भारताच्या यानाला चंद्रावर सापडले पाणी

News Desk