HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पोंक्षे, राष्ट्रवादी आणि राजकारण !

मुंबई। कोरोनाच्या काळात आर्थिक संकटात सापडलेल्या कलाकारांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचा सामाजिक कार्यक्रम काल (२३जून ) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यवाही प्रमुख म्हणून अभिनेते शरद पोंक्षे यांच्या हजेरीने राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने बॅकस्टेज कलाकारांना कोरोना काळात तीस लाखांहून अधिक रकमेची आर्थिक मदत करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून जी मदत केली गेली त्याबद्दल शरद पोंक्षेंनी आभार मानले.
तसेच शरद पोंक्षेच्या हजेरीने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या लक्षात येता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण देत पक्षांची भूमिका मांडली. मात्र, आता महात्मा गांधींची हत्येचं समर्थन करणाऱ्या आणि आएसएसच्या विचार धारा असलेल्या शरद पोंक्षे यांच्यामुळे राजकारण सुरू झाले आहे.

शरद पोंक्षे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात काय म्हणाले ?

“कोरोनाच्या संकटकाळात राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून जी मदत केली गेली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो” असं ते म्हणाले
“मागच्या काळात अजित दादांनी रंगभूमीला ५ कोटी रुपयांची मदत केली होती. अशीच मदत या संकटकाळातही करावी,” अशी विनंतीही शरद पोंक्षे यांनी अजित पवार यांना यावेळी केली.

शरद पोंक्षे यांचा आणि पक्षाचा कोणताही संबंध नाही व कधीच नसेल

यावर स्पष्टीकरण देताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ‘महात्मा गांधींची हत्या हे भारतातील पहिले दहशतवादी कृत्य होते. गांधींच्या हत्येचे समर्थन करणारे विचार, हेदेखील निश्चितच विकृत विचार आहेत, अशी माझी ठाम धारणा आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने बॅकस्टेज कलाकारांना कोरोना काळात तीस लाखांहून अधिक रकमेची आर्थिक मदत करण्यात आली. याबद्दल आभार मानण्यासाठी शरद पोंक्षे हे नाट्य परिषद पदाधिकारी, नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासोबत पक्ष कार्यालयात आले होते. यापलीकडे शरद पोंक्षे यांचा आणि पक्षाचा कोणताही संबंध नाही व कधीच नसेल.’

’राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गांधीवादी विचारांचा पक्ष आहे. गांधीहत्येचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीवर गांधीवादी लोकांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानण्याची वेळ यावी, हाच महात्मा गांधींच्या विचारांचा विजय आहे’ असे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे.

पोंक्षे येणे हे क्लेश कारक दुर्दैवी होते

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात शरद पोंक्षेंच्या हजारावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची काय प्रतिक्रिया असणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. याप्रकरणी आव्हान यांनी ट्वीट करत म्हटले “राष्ट्रवादी पक्षाच्या व्यासीठावर हा विकृत शरद पोंक्षे येणे हे क्लेश कारक दुर्दैवी होते पण पुरोगामी कार्यकर्त्यांचा आक्रोश जयंत पाटील ह्यांच्या कानी पडताच त्यांनी पक्षाची भूमिका अत्यंत तत्परतेने स्पष्ट केली त्याबद्दल त्यांचे आभार, ” असे ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कीटकनाशक व्यवस्थापन कायदा -२०१७ तात्काळ अस्तित्वात आणा -महाराष्ट्राच्या शेतकरी मिशनची मागणी

News Desk

नवमतदारांनो ! मतदानाला जाताना ‘हे’ नक्की वाचा

News Desk

मुंबईतील बेकायदेशीर शाळांवरून नितेश राणेंचा ठाकरे सरकारला सवाल

News Desk