HW News Marathi
महाराष्ट्र

पूर्वीच्या सरकारने विदर्भाची उपेक्षाच केली !

मुंबई | “पूर्वीचे मुख्यमंत्री दिल्लीला जायचे. मात्र, रिकाम्या हाती परत यायचे. गेली १५ वर्षे राज्यात जे सत्तेत होते त्यांनी कायम विदर्भाची उपेक्षाच केली. विदर्भासाठी असलेला निधी, लोकांच्या हक्काचे पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. त्यांच्या मंत्रिमंडळाकडून मंजूर होणारे निधी त्यांच्याच असायचे”, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजानदेश यात्रेला आजपासून (१ ऑगस्ट) मोझरी येथून प्रारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.

“गेल्या ६० वर्षांत जेवढे काम झाले नाही तेवढे काम भाजप सरकारने गेल्या ५ वर्षांत करून दाखवले आहे. मी विरोधी पक्षांना आव्हान देतो कि त्यांनी माझ्याशी याविषयी कोणत्याही मंचावर वादविवाद करावा. त्यांनी सिद्ध करून दाखवावे की, महाराष्ट्रात भाजपने विकास केला नाही. जर माझे हे बोलणे खोटे ठरले तर मी जनतेकडे जनादेश मागत फिरणार नाही”, असे दावा देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्याचप्रमाणे, यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपण जनतेचे सेवक असल्याचे म्हटले आहे. “जनताच आमचे दैवत आहे. मी जनतेला उत्तरदायी आहे. मी जनतेचा सेवक आहे. जनतेचा आदेश घेण्यासाठीच ही महाजनादेश यात्रा आहे”, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“वाढदिवसानिमित्त विक्रम बनवता यावा म्हणून पंधरा दिवसांचे लसीकरण कमी करण्यात आले हे चुकीचे” – नवाब मलिक

News Desk

भाजपच्या उपमहापौरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वापरले अपशब्द

News Desk

आवास योजनांच्या कामांना गती देऊन प्रत्येक गरजूला घर मिळवून द्या! – बच्चू कडू

Aprna