HW News Marathi
महाराष्ट्र

पालघरमध्ये राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर अडवला

मुंबई | राज्यभरात सोमवारपासून दूध उत्पादकांना अनुदान देण्याच्या मागणीवरून शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सर्वच दूध उत्पादक क्षेत्राची कोंडी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत.

आज दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरूच आहे. ‘कालपासून मुंबईत दुधाचा एकही टँकर येऊ दिला नाही’, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. तर आज गुजरातमधून महाराष्ट्रात दुधाचे टँकर येऊ नये म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पालघरमध्ये आंदोलन केले आहे.

या आंदोलनात कार्यकर्त्यांसोबत स्वत: खासदार राजू शेट्टी देखील सहभागी झाले. आज गुजरातहून मुंबईत येणारा पहिला दुधाचा टँकर त्यांनी परत पाठवला आहे. गोकुळ संघाचा हा दुधाचा टँकर होता. त्यामुळे हे आंदोलन असेच सुरू राहिल्यास उद्या मुंबईमध्ये दूध पुरवठा पूर्णपणे ठप्प होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जिल्हा प्रशासन, पोलिसांनी आता अधिक सतर्क राहून लॉकडाऊन नियमांचे काटेकोर पालन करावे !

News Desk

आता महाशिवआघाडी नव्हे तर महाविकासआघाडी ?

News Desk

निकालापूर्वीच मुश्रीफांची विजयी मिरवणूक तर पुण्यात दोडके यांनी बॅनरबाजी

News Desk
कृषी

सरकार आता रिलायन्स, रामदेव बाबा यांच्या दुधाची वाट पाहतेय का? 

News Desk

नागपूर | स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून दूध आंदोलन सुरू केले आहे. या दूध आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर, पावसाळी अधिवेशनात देखील पडताना दिसत आहे. आता सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दूध डेअरी आणि पतंजलीचे दूध येण्याची वाट पाहते का? असा सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर ही वेळ आली असल्याची टीका देखील धनंजय मुंडे यांनी केली आहे. समाधानकारक पाऊस पडत आहे. तर शेतकरी शेतातील कामे करण्याऐवजी शेतकऱ्यांवर भरपावसात रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करण्याची वेळी सरकारने आणली आहे. प्रत्येकवेळी रस्त्यावर उतरल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणारच नाही का ?, हे जणू सरकारने धोरण ठरवले आहे काय ?, असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

राज्य सरकारने २६ जून २०१७ रोजी गाईच्या दुधाला २७ रुपये आणि म्हशीच्या दुधाला ३६ रुपये भाव जाहीर केला होता. परंतु शेतकऱ्यांना केवळ १७ रुपये भाव मिळत आहे. यामुळे गतवर्षापासून शेतकरी प्रतिलिटर मागे १० रुपयांची फसवणूक सरकार करत असल्याची जाणीव शेतकऱ्यांना झाली आहे. या आंदोलन केल्यानंतर सरकार केवळ आश्वासन देते, असे देखील मुंडे यांनी सांगितले आहे.

Related posts

केवळ 15 गुंठे जमीनमुळे मजूर झाला बागायतदार

News Desk

झेंडुच्या शेतीमुळे शेतकऱ्यांना दसरा पावला

News Desk

शेतकरी सन्मान योजनेचा बोजवारा, शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेले पैसे गेले परत

News Desk