HW News Marathi
महाराष्ट्र

पोलिसांचे कुटुंबीय पोहोचले कृष्णकुंजवर, राज ठाकरे म्हणाले…..

मुंबई | दादरच्या नायगाव परिसरातील पोलीस वसाहतीतील नागरिकांना घर खाली करण्याची नोटीस अली आहे. पोलिस वसाहत धोकादायक असल्याने या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. यानंतर पोलिसांच्या कुटुंबीयांकडून आक्रोश व्यक्त केला जात असून विरोधी पक्षनेत्यांनीही त्यांच्या भेटी घेतल्या आहेत. दरम्यान पोलिसांचे कुटुंबीय आज याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर दाखल झाले होते. राज ठाकरेंनी यावेळी त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या आहेत.

चिंता करु नका

पोलिस वसाहतीतील लोकांना घर खाली करण्यासाठी नोटीस अली आहे. तिथले नागरिक राज ठाकरेंकडे मदतीसाठी गेले होते. घरं सोडून आम्ही जायचं कुठे असा प्रश्न ते विचारत आहेत. याचसाठी आज पोलिस कर्मचाऱ्यांच्या बायका आणि मुलं आपली व्यथा घेऊन राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचल्या होत्या. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांना चिंता करु नका सांगत आपण याचा पाठपुरावा करु असं आश्वासन दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नायगावमध्ये जाऊन पोलिसांच्या कुटुंबीयांची भेट घेतली

नायगावच्या नागरिकांची या आधी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली होती. यावेळी त्यांनी या इमारती धोकादायक वाटत नसल्याचं सांगत सरकारने त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशी मागणी केली होती. तसंच निर्णयाला स्थगिती द्या असंही म्हणाले होते. यावेळी त्यांनी रहिवाशांना आपण मुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चा करु असं आश्वासनही दिलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा सुरुंग, १० नगरसेवकांनी हाती बांधले शिवबंधन!

News Desk

धारावीत कोरोनामुळे तिसरा बळी, ७० वर्षीय महिलेचा मृत्यू

News Desk

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना लाज वाटली पाहिजे!; वानखेडे प्रकरणावरून सोमय्या संतापले

News Desk