HW News Marathi
महाराष्ट्र

“शरद पवारांनी खंजीर खूपसल्याचं एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडतो”, संजय राऊत

पुणे । महाराष्ट्रात सध्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याचत शाब्दिक वादावादी सुरु आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचं एक उदाहरण दाखवा. मी राजकारण सोडतो, असं ओपन चॅलेंज शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिलं आहे. त्यामुळे चंद्रकांतदादा राऊतांना काय उत्तर देतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आम्ही समोरून वार करतो

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना राऊत यांनी थेट चंद्रकांत पाटील यांनाच ललकारले. चंद्रकांतदादा हरिश्चंद्राचे अवतार आहेत. आम्ही एकत्र काम केलंय. मी तर नेहमी आव्हान देतो शरद पवारांनी खंजीर खूपसल्याचं एक उदाहरण दाखवा. मी राजकारण सोडतो, असं सांगतानाच ही मराठ्यांची औलाद आहे. आम्ही समोरून वार करतो, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

समोरून वार केल्यावर काय निघणार?

संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका करत त्यांना प्रत्युत्तर दिली आहे. “आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. पाठीमागून वार करत नाही. समोरून कोथळा काढतो, असं मी म्हटलं होतं. याचा त्यांना एवढा त्रास झाला की गुन्हा दाखल करा म्हणाले. समोरून वार केल्यावर काय निघणार? कोथळाच निघणार, असा टोला हाणतानाच चंद्रकांतदादांना महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार आलेलं सहन होत नाही. जेवढे तुम्ही तडफडत राहणार. तेवढी तुमची शक्ती क्षीण होईल. आघाडीच्या नेत्यांनाही सांगणं आहे की, तुम्ही विरोधकासारखे वागू नका. मी आज वरिष्ठांशी बोलेन. ऐकलं तर बघू नाहीतर शिवसेनेच्या भाषेत सांगू, असं ते म्हणाले. कोण आला रे कोण आला, ही घोषणा भाजपात बघितली का? ती फक्त शिवसेनेतचं आहे”, असंही त्यांनी सांगितलं आहे.

तुम्हाला आमच्या बरोबरच संसार करायचा

सरकार आलं तरी प्रश्न तेच आहेत. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होतात. जेव्हा आमचं सरकार नव्हतं तेव्हा म्हणायचो आमचं सरकार आल्यावर बघू. मात्र आता बघयाची वेळ आलीये असं वाटतं, असा इशाराच त्यांनी राष्ट्रवादीला अप्रत्यक्षपणे दिला. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झालंय. मात्र स्थानिक पातळीवरील जे वतनदार असतात त्यांनी संयम ठेवावं. काही झालं तरी तुम्हाला आमच्या बरोबरच संसार करायचा आहे. भाजपासोबत सरकार होतं तेव्हा ही हेच होत होतं. त्यांनी आपलं ऐकलं नाही तर तुम्हीही मुख्यमंत्री आमचा आहे असं सांगा. सरकारमधली माणसं चांगली असतात. मात्र स्थानिक राजकारणाचा विषय येतो तेव्हा चढाया सुरू होता. आधीच्या सरकारमध्येही हाच त्रास होता. आपण एवढं ताकदवान व्हायला की पाहिजे पुढच्या वेळेला तो निवडून येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असं ते म्हणाले आहेत.

जेवढं रेटाल तेवढी शिवसेना वर येईल

शिवसेना हा लाव्हा आहे. शिवसेना मागे हटणार नाही. आमचं बळ हे आमच्या मनात आणि मनगटात आहे. आज आमदार आहेत. उद्या असतील की नाही माहीत नाही. सगळ्यांना एकत्रित घेऊन काम करा. शिवसेनेला जेवढं जास्त रेटाल तेवढी ती पुढे येईल. शिवसेनेवर जेव्हा वार झाले तेव्हा रक्ताच्या थेंबागणिक शिवसेना वाढत गेली. त्यामुळे शिवसैनिकांसारखे वागा. लोकांना एकत्रित घेऊन काम करा. बाळासाहेबांचा जो मंत्र आहे 80 टक्के समाजकारण आणि 20 राजकारण ते करा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांच्या पॅनेलने कुटासा गावात १० जागा राखल्या

News Desk

नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी 1200 कोटींचा निधी द्या,मुख्यमंत्र्यांची अमित शहांकडे मागणी!

News Desk

भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतले ताब्यात 

News Desk