HW News Marathi
महाराष्ट्र

‘लोकांनी तारतम्य बाळगावे’, शरद पवारांची विनंती!

मुंबई। कोरोनाचं संकट अजूनही देशातून कमी झालेलं नाही. त्यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारांना कोरोना साथीसंदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यात आणखी काही दिवस खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे पवार यांनी सांगितले. “अन्य घटकांची याबाबत काही मते असतील तर तो त्यांचा अधिकार आहे. मात्र केंद्र सरकारच्या विचाराचे जे लोक राज्यात आहेत त्यांनी तारतम्य ठेवले पाहिजे,” असा चिमटा पवारांनी भाजपा नेत्यांना काढला आहे.

राज्यातील लोकांनी तारतम्य बाळगावे

”करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. राज्य सरकार आणि विशेषत: मुख्यमंत्री त्याचे कटाक्षाने पालन करत आाहेत. या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सुसंवाद आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विचारांच्या राज्यातील लोकांनी तारतम्य बाळगावे,” असे म्हणत पवार यांनी मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या नेत्यांना टोला लगावला आहे.

शेट्टी नाराज आहेत का, हे मला माहिती नाही

पवार म्हणाले की ‘राष्ट्रवादी’कडून जी यादी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने राज्यपालांना दिली. त्यात त्यांचे नाव आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही. त्यांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहतो आहोत. शेट्टी नाराज आहेत का, हे मला माहिती नाही. त्यांनी कोणती भूमिका घेतली असेल, तर त्याबद्दल मला कल्पना नाही, असेही पवार म्हणाले आहेत.

ईडीचा गैरवापर

महाराष्ट्रातच नव्हे, तर पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांतही ईडीचा गैरवापर सुरू आहे. या माध्यमातून विरोधकांना नमवण्याचा प्रयत्न केंद्राकडून सुरू आहे. ईडीचा असा गैरवापर यापूर्वी कधीही झाला नव्हता, असं शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी संपात उद्धव यांची उडी

News Desk

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याची कृती म्हणजे लोकशाहीचा खून! – नाना पटोले

Aprna

देवेंद्र फडणवीस चांगले मुख्यमंत्री होते पण…

News Desk