HW News Marathi
महाराष्ट्र

“पवार कधीच खोटं बोलत नाहीत म्हणणं म्हणजे…!” बोंडेंची पवारांवर बोचरी टीका

मुंबई | “शरद पवार कधीच खोटं बोलत नाहीत असं संजय राऊत म्हणातात, हे असं म्हणण्यासारखं आहे की, मांजर कधीच उंदीर खात नाही,” अशी बोचरी टीका भाजपचे नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केली आहे. बोंडेंची अमरावती हिंसाचाराला पैसे पुरवण्यात हात असल्याचा आरोप करत, त्यांची ऑडिओ क्लिप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट केली. या ऑडिओ क्लिपला प्रत्युत्तर देना बोंडेंनी आज (१८ नोव्हेंबर) पवारांवर टीका केली.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणालं की, शरद पवार कधीच खोटे बोलत नाही? पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देना बोंडे म्हणाले, “हे तर म्हणण्यासारखे आहे की, मांजर कधीच उंदीर खात नाही. “मी माझ्या ट्वीटर स्पेस केलेल्या संभाषणावर ठाम आहे. मी जे काही बोलतोय ते शुद्धीत बोलतो. मी कोणतीही हर्बल तंबाखू किंवा दारू पिऊन बोलत नाही. त्यामुळे मलिकांसारखे बेहोशीत वक्तव्य करत नाही. त्यामुळे जे बोलो त्यावर मी कायम आहे. भाजप सरकारच्या राज्यात दंगली होत नाही. महाविकास आघाडी सरकारसारख्या सेक्युलर सरकारच्या राज्यात दंगली होतात, कारण दंगलीला संरक्षण देण्याचं काम ही सरकार करतात,” असे म्हणत बोंडेंनी मलिकांवर टीका केली.

अनिल बोंडे नेमके काय म्हणालं

“शरद पवारांना मी कालच विनंती केली होती, सांगितलं होतं की इथे शेतकऱ्यांचा असंतोष आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, मदत मिळाली नाही, बोनस जाहीर झाला नाही. शिवाय एसटी कामगारांचा देखील संप आहे, मोठ्याप्रमाणावर असंतोष आहे. त्यामुळे शरद पवार यांनी येऊ नये. अस्वस्थता असंतोष त्यांना कदाचित त्यांच्या दौऱ्यात नागपूर, चंद्रपूरमध्ये दिसला असेल आणि त्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढली असेल. त्यामुळे त्यांनी यवतमाळ आणि वर्धेचा दौरा रद्द केला. माझी डॉक्टर या नात्याने त्यांना विनंती आहे, की त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. कारण, विदर्भातील हवामान राष्ट्रवादीला मानण्यासारखं नाही. शरद पवार कधीच खोटे बोलत नाही, हे असे म्हण्यासारखे आहे की, मांजर कधीच उंदीर खात नाही,” असे बोंडे म्हणालं.

तुम्हाला याची किंमत चुकवावी लागेल | राऊत

“शरद पवार जे बोलत आहेत तो त्यांचा संताप, चीड आणि वेदना आहे. आमच्या मनात तो एक राग आहे. आणि आम्ही महाराष्ट्रात जे महाविकासआघाडीचं सरकार बनवलं ते याच चिडीतून निर्माण झालेलं आहे. सत्तेसाठी काहीही करायचं, केंद्रीय तपास संस्थांचा अमर्याद गैरवापर सुरू आहे. खास करून महाराष्ट्रसारख्या राज्यात ही लोकशाही संकेतांना धरून नाही. शरद पवार यांनी सांगितलंय की, तुम्हाला याची किंमत चुकवावी लागेल. नक्कीच की तुम्हाला यांची किंमत ही चुकवावीच लागेल. या देशाची जनता कधीच कुणाला माफ करत नाही हे आपण इंदिरा गांधी यांच्या काळातही पाहिलंय. आम्ही सगळे प्रमुख लोक, पवार कुटुंबीय अनिल देशमुख तुरुंगात आहेत. छनग भुजबळांना तर क्लीनचीट मिळाली. मग त्यांनी इतका काळ तुरुंगात घालवाला त्यांचे का?, त्यांची भरपाई कोण करणार आमचं अनिल परब आहेत. प्रतापसरनाईक आहेत. फक्त आम्हीच तुम्हाला दिसतोय का?, भाजपमध्ये किंवा तुमचे चमचा मंडळ आहेत. संगळे धुतल्या तांदळासारखे आहेत,” असे म्हणत राऊतांनी भाजपवर टीका केली आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही तुरुंगवासाला घाबरणारे लोक नाहीत; फडणवीसांचा सरकारला इशारा

Aprna

महाराष्ट्र हे आरोग्य पर्यटन क्षेत्रात पसंतीचे राज्य! – मंगल प्रभात लोढा

Aprna

पवारांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय स्नेहभोजनात राऊत आणि गडकरींची उपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna