HW News Marathi
महाराष्ट्र

‘…तेव्हा सोनू सूद कोणाचे होते?’, संजय राऊतांचा पंतप्रधानांवर निशाणा

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या (७ फेब्रुवारी) भाषणामुळे देशभरातील राजकीय पक्षांकडून व नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. मोदींच्या वक्तव्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर आणि भाजप पक्षावर टीकेची झोड उठवली आहे. तर महाराष्ट्रातही राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पंतप्रधान मोदींनी देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरवण्यास काँग्रेस जबाबदार आहे, अशी टीका केली आहे. तर महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यास भाग पाडलं, असा गंभीर आरोप मोदींनी केला आहे.

मोदींच्या या वक्तव्यानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. महाराष्ट्र काँग्रेससोबतच शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनीही मोदींच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रामुळे महामारी आली असं म्हणणं म्हणजे हा सरकारसह डॉक्टर्स आणि नर्स यांचा अपमान आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. याबाबत भाजपच्या प्रमुख नेत्यांनी पुढं येऊन बोलायला हवं. तसेच सोनू सूद त्यावेळी कोणाचे होते? त्यावेळी त्यांचं कोणी कौतुक केलं?, असे सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत. संजय राऊत आज दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

डॉक्टर, नर्स यांचा अपमान

राऊत म्हणाले, “पंतप्रधान मोदींचे भाषण मी ऐकलं, ऐकताना माझ्याकडून काही चूक तर झाली ना म्हणून मी ते वाचलंही. पंतप्रधानांनी महाराष्ट्राबाबत उल्लेख केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेच याचा खुलासा करायला हवा. मला हे ऐकून वाईट वाटलं. या महामारीचा उगम चीनमधून झाला आहे. त्याचं खापर महाराष्ट्रावर फोडणं योग्य नाही. जागतिक आरोग्य संघटनेनं सुद्धा धारावी पॅटर्नचं कौतुक केलं होतं. महाराष्ट्रामुळे महामारी आली म्हणजे हा सरकारसह डॉक्टर, नर्स यांचाही अपमान आहे. आता भाजपच्या प्रमुख नेत्यांनी याबाबत पुढं येऊन बोलायला हवं. आम्ही एकट्यानेच बोलायचा ठेका घेतलाय का”, अशी टीका त्यांनी केली आहे.

प्रत्येक वेळी बोलायला मी ठेका घेतलाय का?

महाराष्ट्र सरकार कसं काम करतंय याचे दाखले उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने इतरांना दिले होते. तसेच सोनू सूद हे कोणाचे होते? सोनू सूदला राज्यपालांकडं कोण घेऊन जातं होतं, असे प्रश्न राऊतांनी निर्माण केले आहेत. त्यामुळे यासंदर्भात राज्य सरकारनेच सविस्तर भूमिका मांडायला हवी.तर प्रत्येक वेळी बोलायला मी ठेका घेतलाय का? असं म्हणत राज्य सरकारमध्ये बसलेल्या नेत्यांनीही आता बोलावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच बाळासाहेब थोरात यांनीही यावर बोलावं, असंही राऊत म्हणालेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपुरातही १ कोरोना रुग्ण पॉझिटीव्ह

swarit

“फडणवीसांनी गुन्हेगारांना सरकारी आयोग, महामंडळाचं अध्यक्षपद का?” | मलिक

News Desk

प्रवासी रेल्वेच्या बाबतीत रेल्वेने कोणताही प्रोटोकॉल काढला नाही

News Desk