HW News Marathi
Covid-19

राज्यातील शाळा- काॅलेज ३१ मार्चपर्यंत बंद !मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई | सध्या जगभरामध्ये कोरोनावायरसमुळे महामारी आली आहे. कोरोनाच्या भीतीने समाजातील सर्वचं घटकांवर परिणाम झालेला आहे. महाराष्ट्रातील परीक्षांचा महिना सध्या सुरू आहे.कोरोना वायरसचा शिक्षण विभागावरसुद्धा परिणाम झालेला आहे .याआधी सरकारने पुणे-पिंपरी चिंचवडमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आरोग्य विभागाकडून शिक्षण विभागाला राज्यातील शाळा बंद करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आणि तो शासनाकडून मंजूरही करण्यात आला आहे. राज्यातील शाळा आणि विद्यालयं 31 मार्चपर्यंत बंद असणार आहेतं

शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व नगरपालिका, महापालिका, नगरपंचायत शाळा, सरकारी आणि खाजगी शाळा आणि महाविद्यालयं 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येतील. राज्यातील सर्व खाजगी, सरकारी शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील शाळा बंद राहणार आहेत. या शाळा आणि महाविद्यालय मात्र शहरी भागातील आहेत, ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आढळला नसल्याने ग्रामीण भागातील शाळा सुरू असतील. शाळांसोबतच अंगणवाड्याही बंद राहतील आणि आयटीआय कोर्सेसदेखील बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीचे आरोग्यमंत्री ऑक्सिजन सपोर्टवर, फुफ्फुसात कोरोना संसर्ग वाढल्याची माहिती

News Desk

पुण्यात मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू,अजित पवारांसह जिल्हातील आमदार,खासदारांची उपस्थिती

News Desk

पुण्यात शिवसैनिकाला सुखाने जगू द्या; शिवाजी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

Aprna