HW News Marathi
महाराष्ट्र

#MaharashtraResult2019 : पवारांच्या ‘त्या’ भाषणामुळे उदयनराजेंचा पराभव

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर पावसात उभे राहून साताऱ्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली होती. त्यावेळी पवार म्हणाले की, “लोकसभेमध्ये माझ्याकडून चूक झाली, हे मी जाहीर सभेत मान्य करतोय,” अशा शब्दात पवारांनी उदयनराजेंवर टीका केली होती.

तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर विजयी झाले होते. परंतु उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर उदयनराजेंचा पराभव करण्यासाठी पवारांनी साताऱ्यात भर पावसात उदयनराजेंना उमेदवारी देऊन चूक केल्याचे मान्य करत, जनतेशी भावनिक साद घातली.

पवार पावसातले त्या भाषणात नेमके काय म्हणाले

“लोकसभेमध्ये माझ्याकडून चूक झाली, हे मी जाहीर सभेत मान्य करतोय,” असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्याचे माजी खासदार आणि भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला. “एखाद्या माणसाकडून चूक झाली की, त्याने ती चूक कबुल करायची असते. लोकसभेमध्ये उमेदवार निवडण्यामध्ये माझ्याकडून चूक झाली, हे मी जाहीर सभेत मान्य करतोय, पण आता ती चूक सुद्धरविण्यासाठी साताऱ्यातील घराघरातील प्रत्येक तरुण आणि वडील धारी व्यक्ती २१ तारखेची वाट बघत आहे. आपल्या मतांनी निर्णय देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना भरगोस मतांनी विजयी करण्याचे भर पावसात सभा संबोधित करत उपस्थितांना आवाहन केले. ”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर परमबीर सिंह मुंबईत दाखल!; म्हणाले, “मी…”

News Desk

“भाजप गरुडासारखी, कितीही डोमकावळे मानेवर बसले तरी सगळ्यांना पुरून उरू!”

News Desk

कंगना राणावतला ट्विटरनंतर आता इन्स्टाग्रामचाही दणका, ‘कोरोना पार्टी’ पडली महागात

News Desk