HW News Marathi
महाराष्ट्र

भारत भालके यांच्या जण्याने कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले – शरद पवार

पंढरपूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (२८ नोव्हेंबर) पंढरपुरातील सरकोली येथे अंत्यसंस्कार केले जातील. भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीसह दिग्गज नेत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ट्वीट करत त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!,” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.

“पंढरीच्या विठुरायाचा वारकरी भारत नाना आज अचानक निघुन गेले ही बातमी खुप व्यथित करणारी आहे. नाना तुमच्या कडे पाहताक्षणी मुठभर मास वाढायचं. आपण अचानक EXIT घेऊन मनाला वेदना दिल्यात,” असे ट्वीट करत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भारत भालके यांना श्रद्धांजली वाहिली.

 

 

भारत भालके यांना अनेक नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. आमदार रोहीत पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार उदयराजे भोसले सगळ्यांनी भालके यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली आहे.

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“…गरीबांच्या घरी जेवण नाय”; ‘मविआ’च्या आमदारांनी चूल रचून गॅस दरवाढीचा केला निषेध

Aprna

आमच्या भेटीचे वेगळे अर्थ काढू नका !

News Desk

‘राज ठाकरे यांच्या भेटीत काय घडलं हे मोदी-शहांना सांगणार,’ चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान!

News Desk