HW News Marathi
महाराष्ट्र

शिरीष कुलकर्णी यांनी पोलिसांना शरण यावे | मुंबई हायकोर्ट

पुणे | प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. के. यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी याला अटकपूर्व जामीन देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. शुक्रवारपर्यंत पोलिसांना शरण या अन्यथा या संदर्भात आम्हाला निर्णय द्यावा लागेल असे कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितले आहे.

डीएसके यांच्या बांधकांम व्यवसायापासून आपण वेगळेच आहोत असे सांगून तुम्हाला काद्यापासून दूर पळता येणार नसल्याचेही हायकोर्टाने यावेळी म्हटले आहे. तसेच या अटकपूर्व जामीन अर्जावर तुमचा युक्तीवाद ऐकण्यास आम्हाला काहीही स्वारस्य नाही असेही कोर्टाने शिरीष यांच्या वकिलांना सुनावले आहे.

डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी सध्या गुंतवणुकदारांची फसवणुक केल्या प्रकरणी पुण्यातील कारागृहात शिक्षा भोगत आहेत. तर शिरीष यांची पत्नी तन्वी यांनी देखील पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असल्याची माहिती समोर आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आता गणेशोत्सव, नवरात्रीही उत्साहात साजरे करा! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Manasi Devkar

खाल्या मिठास न जागणाऱ्या लोकांवर जया बच्चन यांनी हल्ला केल्यानंतर सामनातून त्यांची पाठराखण

News Desk

ट्रक-ट्रव्हलमध्ये भीषण अपघात, सहा ठार 14 जखमी

News Desk
राजकारण

प्रभू रामचंद्रांची फसवणूक भाजपाला पडणार महागात

News Desk

अयोध्या | भाजपाचे सरकार प्रभू रामचंद्रांची फसवणूक केली आहे असे विधान राम जन्मभूमी मंदिराचे प्रमुख संत आचार्य एस. दास यांनी केले आहे. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. भाजप प्रभू रामाचे नाव घेत सत्तेत आले मात्र त्यानंतर त्यांना प्रभू रामाचा पूर्णपणे विसर पडला असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.

‘भाजपाला २०१९ ची लोकसभा निवडणूक जिंकायची असल्यास, त्यांनी आता राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात करावी. अन्यथा आगामी निवडणूक जिंकणे भाजपाला जड जाईल,’ असे आचार्य दास म्हणालेत. काही तासांपूर्वीच चवानी मंदिराचे महंत परमहंस दास यांनी राम मंदिराचे बांधकाम तातडीने सुरू न केल्यास भाजपाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. यानंतर आता राम जन्मभूमी मंदिराचे प्रमुख संत आचार्य दासदेखील या मुद्यावरुन आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.

 

 

Related posts

मोदी सरकारची गत नव्या नवरीसारखी !

News Desk

जगातील ह्या आभासी मोठ्या पक्षाची सध्या लावारीस भक्तांवरच भिस्त, मनसेचे प्रत्युत्तर

News Desk

उदयनराजे स्वतःच्या जीवावर निवडून येतात

News Desk