HW News Marathi
Covid-19

शिवसेना अन् अयोध्येचे पूर्वापारचे नाते, पक्षप्रमुखांना निमंत्रणाची आवश्यकताच नाही !

मुंबई | कोरोना काळात प्राधान्य काय हे लक्षात घ्यायला हवे अशी भूमिका मांडत अयोध्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यावरून एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान मोदींवर टीका करताना दिसले. मात्र, दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राम मंदिराच्या भूमिपूजनाकरिता अयोध्येला जातील, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. याला आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील दुजोरा दिल्याचे पाहायला मिळत आहे. “अयोध्येचा रस्ता हा शिवसेनेने तयार केला आहे. शिवसेनेचे अयोध्येशी पूर्वापारचे नाते आहे. त्यामुळे अयोध्येला जाण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुखांना कोणाच्याही निमंत्रणाचा आवश्यकता नाही”, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

अयोध्या राममंदिराच्या भूमिपूजनाच्या मुद्द्यावरून देशभरात विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच राज्यातील राजकारणही तापले आहे. शरद पवारांच्या टीकेमुळे राज्यात शरद पवार विरुद्ध भाजप असे चित्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भूमिकेबद्दल माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले कि, “अयोध्येचा रस्ता हा शिवसेनेने तयार केला आहे. अयोध्या आणि शिवसेनेचे पूर्वापारचे नाते आहे. हे नाते केवळ राजकारणापुरते नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री नसताना आणि असतानाही अयोध्येला जाऊन आले आहेत. त्यामुळे त्यांना अयोध्येला जाण्यासाठी कोणाच्याही निमंत्रणाची आवश्यकता नाही.”

“अयोध्येच्या रस्त्यातील अडथळे दूर शिवसेनेने तो रस्ता तयार केला आहे. राम मंदिरासाठी श्रद्धा आणि हिंदुत्त्वाच्या भावनेतून शिवसैनिकांनी बलिदान दिले आहे”, असेही पुढे राऊत म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या हस्ते येत्या ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा होणार आहे. यावेळी, मोजक्याच लोकांची उपस्थिती असेल अशी माहिती मिळते. यात भाजपकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आमंत्रण असणार का ? तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे शरद पवारांनी अयोध्या राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत नाराजी व्यक्त केलेली असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहणार का ?, असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित होतो आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काळजी करू नका… २-३ दिवसात बऱ्या व्हाल ! ९० वर्षांच्या आज्जींना जयंत पाटलांनी दिला धीर

News Desk

केंद्र व राज्य सरकारने केलेल्या सूचना तंतोतंत पाळूया नाहीतर… शरद पवार काय म्हणाले ?

Arati More

राज्यात कोरोनाचे २४६५ रुग्ण बरे होऊन घरी, एकूण रुग्ण संख्या १४ हजार ५४१ वर

News Desk