HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील स्थितीबाबत पवारांना चिंता, सरकार लवकर स्थापन व्हावे !

मुंबई | “शरद पवारांसोबदची भेट ही सदिच्छा भेट असून राज्यातील स्थितीबाबत पवारांना चिंता व्यक्त केली”, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यामांना सांगितले. राऊत पुढे म्हणाले की, “सरकार लवकर स्थापन व्हावे,” अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची इच्छा असल्याचे देखील त्यांनी माध्यमांना सांगितले. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवस उलटून गेले असून राज्यात अद्याप सरकार स्थापन झाले नाही. शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून सत्ता संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष संपण्याचे नाव घेतानाचे चिन्हे दिसत नाहीत.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली आहे. “शरद पवारांसोबदची भेट ही सदिच्छा भेट असून राज्यातील स्थितीबाबत पवारांना चिंता व्यक्त केली”, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यामांना सांगितले. राऊत आणि पवारांमध्ये १० मिनिटे चर्चा झाली आहे.

या भेटीदरम्यान दोघांमध्ये राज्यातील राजकीय समीकरणावर काय चर्चा होणार किंवा राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. शरद पवार आज (६ नोव्हेंबर) दुपारी १२. ३० व्हाय. बी. चव्हाणमध्ये पत्रकार परिषदे घेणार आहे. तसेच पवारांनी विरोधी पक्षात बसणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी आजच्या पत्रकार परिषदेत नेमकी काय भूमिका पवार घेतील. यावर राज्याचे पुढील समीकरणे ठरणार आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…नाहीतर मी राजकारणात येणारच नव्हते” पंकजा मुंडेंचा मोठा खुलासा

News Desk

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू

News Desk

ज्ञानासाठी विद्यार्थ्यांना तुडवावा लागतोय गुडघाभर चिखल, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

Manasi Devkar