HW News Marathi
महाराष्ट्र

तंगड्या तोडण्याची भाषा करू नका, ही भाषा महाराष्ट्रात चालत नाही !

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी करीम लाला भेटण्यासाठी इंदिरा गांधीही आल्या होत्या, असे वक्तव्य एका वृत्त वाहिनीच्या मुलाखतीत केले होते. यावरून देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून राऊतांनी आज (१६ जानेवारी) सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले की, “अंडरवर्ल्ड करीम लाला हे पठाण संघटनेचे नेते होते. पठाणांच्या समस्या जाणून घेण्यासाठी इंदिरा गांधी भेटल्या होत्या. तसेच इंदिरा गांधींवर टीका झाली तर आम्ही त्यांच्या समर्थनार्थ बोलायचो, असे स्पष्टीकरण राऊतांनी दिले. राऊत पुढे म्हणाले की, “काही लोक विनाकारण वाद निर्माण करत आहेत,” असे म्हणत वादावर पडदा टाकण्याचा राऊतांनी प्रयत्न केला आहे.

“लोकशाहीत सर्वांच प्रश्न विचारण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. त्यामुळे तंगड्या तोडण्याची भाषा करू नका, तंगड्या प्रत्येकाकडे आहे. आणि ही भाषा महाराष्ट्रात चालत नाही. मारहाण करण्याची धमकी देणे चुकीचे असल्याचे राऊतांनी पत्रकार परिषदेत म्हणाले. छत्रपतींच्या गाद्दीबद्दल आम्हाल आदर कायम आहे. छत्रपती शिवाजी महाराजा हे कोणाची वैयक्तिक मालकीचे नाही. महाराष्ट्रातील ११ कोटी जनता छत्रपतींचे वंशज, असे म्हणत राऊतांनी महाराजांच्या वंशजांना टोला लगावला आहे. राऊत पुढे म्हणाले की, आम्ही तुमचा आदर राखतो, तुम्ही आमचा राखा, उदयनराजेंच्या आई कल्पना राजे शिवसेनेत होत्या, असेही राऊत यावेळी बोलले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समीर वानखेडेंवर एनसीबी कार्यालयाबाहेर पुष्पवृष्टी, शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून सत्कार

News Desk

राज्य मंत्रिमंडळात २ नव्या नेत्यांना मिळणार स्थान तर अनेक खात्यांमध्ये होणार खांदापालट

News Desk

पंडित नेहरूंवर टीका करणे राज्यपालांना शोभत नाही, नाना पटोलेंचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर हल्लाबोल!

News Desk