HW News Marathi
महाराष्ट्र

आमची बाजू सत्याची आणि विजय आमचाच होणार !

मुंबई | “आमची बाजू सत्याची आणि विजय आमचाच होणार, “असा विश्वास शिवसेनेचा खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. “अजित पवारांवर दबाव टाकण्यात आला असावा,” असा दावा देखील राऊतांनी यावेळी केला आहे. “अजित पवारांचे अश्रू आता पुन्हा एकदा राज्यातील जनतेला दिसतील असे देखील राऊत यावेळी म्हणाले. अजित पवारांची मनधरणी हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मुद्दा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.” अजित पवार हे अत्यंत हळवे आणि संवेदनशील असल्याचे देखील राऊत म्हणाले.

“कितीही प्रयत्न करा पण आम्ही भाजपला पुरून उरू,” असे म्हणत राऊतांनी भाजपला धमकी वजा इशारा दिला आहे. राऊत पुढे म्हणाले की, विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपपेक्षा १० जागा आम्हाला जास्त मिळतील आणि बहुमत सिद्ध करू, असा विश्वास त्यांनी आज (२५ नोव्हेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले आहे.

आमदारांची सह्या आणि फोटोंसह सगळी कागदपत्रे असल्यामुळे सरकार हे महाविकासआघाडीचेच येणार असल्याचा दावा राऊतांनी केला आहे. “आमचे सरकार स्थापन झाल्यावर आमचा आरोग्यमंत्री झाल्यावर आम्ही वेड्यांची इस्पितळे उभारू, वेड्यांची इस्पितळ तयार करणार आहोत. कारण सत्ता हातात नाही आली तर हे वेडे होतील.” तसेच ‘ऑपरशन कमल’ हे विधानसभा निवडणुकीत दिसून आले आहे. त्यावर आता बोलण्यासारखे काही नाही,” असे देखील राऊत यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नवा कृषी कायदा करावा – अशोक चव्हाण

News Desk

महाराष्ट्रातील कोरोनाच्या स्थितीवरुन राज ठाकरेंनी केली सरकारची पाठराखण!

News Desk

पवार-ठाकरेंच्या चर्चेनंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

News Desk