HW News Marathi
महाराष्ट्र

‘ऐरे गैरे नथु खैरे’, जयदत्त क्षीरसागरांची पुतणे संदीप क्षीरसागरांवर टीका

बीड | शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर काल (२३ मार्च) बीडमध्ये सभा आयोजित केली होती. त्यावेळी शिवसेनेचे नेते काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांचे पुतणे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला आहे. “राजकारणात यश-अपयश येते असतात. एकदा निवडून आल्यावर त्यांना असे वाटते. या आमदारांना लगेच सत्तेचे पंख फुटलेत. ऐरे गैरे नथु खैरे, असे आले आणि गेले असे अनेक पाहिलेत आम्ही सात बारा पक्का झाला,” असा टोला शिवसेनेचे नेते काका जयदत्त क्षीरसागर यांनी पुतणे संदीप क्षीरसागर  यांच्यावर केली आहे.

या काका-पुतण्यामध्ये २०१९ विधानसभा निवडणुकीपासून यांच्या नात्यात कटूता आली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांचा विजय झाला होता. त्यापासून हे काका-पुतणे एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शिवसंपर्क अभियान सुरु केले. यावेळी उपस्थिती शिवसैनिकांना संबोधित करताना पुन्हा एकदा काका-पुतणे टीका केली. 

नेमके काय म्हणाले

जयदत्त क्षीरसागर म्हणाले, “राजकारणात यश-अपयश येते असतात. एकदा निवडून आल्यावर त्यांना असे वाटते. या आमदारांना लगेच सत्तेचे पंख फुटलेत. ऐरे गैरे नथु खैरे, येथे फक्त नारळे फोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सत्तेत आला म्हणून अनेकांना असे वाटत असेल की, सातबारा पक्का झाला की काय? यामुळे असे आले आणि गेले असे अनेक पाहिलेत आम्ही सात बारा पक्का झाला. सत्तेतून टोल कसा वसूल करता येईल, हेच पाहू या. पण विकासाचे प्रश्न आम्ही आणले ते कोणीच आणले नहाी, असे ते म्हणाले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऊसतोड कामगारांच्या मुलांबाबतच्या पोस्टला पंकजा मुंडेंचं उत्तर…..!

News Desk

‘राज्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय’, मुख्यमंत्र्यांची आपत्कालीन बैठक!

News Desk

मानवी मनोरे न रचण्याचा सरकारचा आदेश!

News Desk