HW News Marathi
महाराष्ट्र

आमदार शिवाजी कर्डिलेच्या पोलीस कोठडीत वाढ

अहमदनगर | भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना १६ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोडी प्रकरणी शिवाजी कर्डिले यांना अटक करण्यात आली होती. शिवाजी कर्डिक यांची शुक्रवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

या प्रकरणात कर्डिक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर दगडफेक करुन, कार्यालयाचे लाकडी दरवाजे तोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करुन अनधिकृरित्या कार्यलायत प्रवेश केला. पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचारी यांना शिवीगाळ केली होती.

या प्रकरणात पोलिसांनी शिवाजी कर्डिले यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केले होते. न्यायालयाने शिवाजी कर्डिले यांच्यासह काशिनाथ बबन शिंदे, मयुर कटारिया, सिद्धार्थ शेलार व संजू दिवटे यांच्याही पोलीस कोठडी १६ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

शिवसेना पदाधिकारी हत्या प्रकरण

अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव येथे शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या हत्या झाल्यानंतर आमदार शिवाजी कार्डिले यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक यांच्या कार्यलयाची तोडफोड केली होती. त्यामुळे केडगाव पोलिसांनी शिवाजी कार्डिले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा केंद्रसरकारवर घणाघात!

News Desk

भाजपच्या बाटग्यांचं महामंडळ म्हणजे शिवसेनेवर सोडलेले भाडोत्री कुत्तरडेच!

News Desk

सरकार येणार या आनंदात राहू नका, नाही आले तर दु:खही करू नका !

News Desk
राजकारण

राहुल गांधींचे मोदींना दोन प्रश्न

News Desk

दिल्ली | कश्मीर मध्ये अल्पवयीन मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि भाजपचे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांना उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी सीबीआयने केलेली अटक या दोन्ही प्रकरणांची सांगड घालत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला आहे.

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात पिडीत तरुणीने भाजपचे आमदार कुलदीप सिंह सेंगर आणि त्यांच्या भावाने जून २०१७ मध्ये बलात्कार केल्याचा आरोप केला असून न्याय मिळावा म्हणून पीडित तरुणीच्या कुटुंबियांनीउत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीच्या वडिलांना यावेळी पोलिसांनी अटक केली. परंतु पोलीस कोठडीत पीडित तरुणीच्या वडिलांचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे खळबळ माजली.

या दोन्ही प्रकरणावर बेटी बचाव बेटी पढाव ची मोहीम चालवणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच का बोलत नाहीत अशा आशयाचे ट्विट करत राहुल गांधी यांनी मोदींवर टिका केली आहे. पंतप्रधान मोदी अशा प्रकारे तुम्ही शांत रहाणे अनपेक्षित आहे. महिला व मुलांवरील वाढत्या हिंसाचाराबद्दल तुम्हाला काय वाटते? बलात्कारी आणि खूणी लोकांना राज्यात संरक्षण कसे मिळते ? असे दोन प्रश्न विचारत भारत तुमच्या उत्तराच्या प्रतिक्षेत आहे असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. तर या ट्विटला ट्विटरवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. #SpeakUp असा हॅश टॅग वापरत सध्या लोक या ट्विट वर आपला निषेध व्यक्त करत आहेत.

Related posts

पहा…मुलींनंतर आता डास पळविणार आमदार राम कदम

News Desk

शास्त्रीनगर झोपडपट्टीतील रहिवाशांना प्रशासनाची अपुरी मदत

News Desk

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

Manasi Devkar