HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात भाजपचे सरकार होऊ नये !

मुंबई | महाराष्ट्रात भाजपचे सरकार होऊ नये, असे मत काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मांडले. दलवाईंनी आज (६ नोव्हेंबर) ‘सामना’च्या कार्यालयात दाखल जाऊन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. राऊत आणि दलवाईं या दोघांमध्ये बंद दाराआड काय चर्चा नेमकी काय झाली, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या भेटीनंतर माध्यमाशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपचे सरकार आणि कुठल्याही परिस्थिती त्यांचा मुख्यमंत्री होऊ नये, अशी भूमिका दलवाई यांनी मांडली आहे.

तसेच काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निर्णय घ्यावा, असे विधान दलवाई माध्यमांशी बोलातना केली आहे. राज्यात शिवसेना-भाजप महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल (५ नोव्हेंबर) भाजपच्या कोअर कमिटिच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र, शिवसेना मुख्यमंत्री पदावरून हटून बसली आहे. तर दुसऱ्या बाजुला आम्ही विरोधी पक्षात बसणार असल्याचे पवारांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १३ दिवस उलटून ही राज्यात सरकार स्थापन झाले नाही. शिवसेना मुख्यमंत्री पद आणि सत्तेचे समान वाटपावरून भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. मात्र, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसचे दलवाई यांनी राऊतांशी भेट घेतली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जयसिंगराव गायकवाड उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करत हाती घड्याळ बांधणार

News Desk

भोसरी प्रकरणात एकनाथ खडसेंना दिलासा, २५ जानेवारीपर्यंत सुनावणी तहकूब

News Desk

ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या हिट विकेट पडतायत, गुगलीचीही गरज नाही !

News Desk