HW News Marathi
महाराष्ट्र

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना करावी लागणार कसून तयारी

मुंबई । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. २१ फेब्रुवारीला बारावीची तर १ मार्च रोजी दहावीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने संकेतस्थळावरून हे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. शाळा आणि महाविद्यालयांना याची अंतिम माहिती लवकरच देण्यात येईल असे शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.

दहावीच्या पाठयपुस्तकांचा अभ्यासक्रम २०१८-१९ मध्ये बदली होणार आहे त्यामुळे वेळापत्रक जाहीर करण्यात उशीर झाला असे मंडळाने सांगितले. हे वेळापत्रक संभाव्य असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. तसेच मंडळाने स्पष्ट केले आहे की फेरपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. सोशल मिडीयावर व्हायरल होणा-या वेळापत्रकांवर विश्वास ठेऊ नये असे ही सांगण्यात आले आहे.

संकेतस्थळावर जे वेळापत्रक दिसेल तेच अंतिम असणार आहे. गतवर्षी मंडळाने जाहीर केले होते की जून जुलै मध्ये दहावी बारावीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल,परंतु यंदाही वेळापत्रक जाहीर करण्यास उशीर झाला याचे कारण अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आला आहे.

दहावी बारावीचे वेळापत्रक पहाण्यासाठी इथे क्लिक करा…

www.mahahscboard.maharashtra.gov.in
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

धुळे-नंदुरबारचा आजचा निकाल म्हणजे उद्याच्या राजकारणाची दिशा आहे –  प्रविण दरेकर

News Desk

बिहारची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार – खासदार प्रफुल पटेल

News Desk

केज नगरपंचायत निवडणूक कमळाशिवाय होतेय ‘हे’ कुणीतरी अमित शहांपर्यंत पोहचवा! – धनंजय मुंडे

Aprna
महाराष्ट्र

कोकणचा हापूस आता भाव खाणार…

swarit

मुंबई | केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग खात्याने हापूसच्या आंब्यावर जीआय टॅग लावल्यामुळे आता कोकणचा हापूस सगळीकडे भाव खाणार आहे. कोकण भागात पिकणाऱ्या आंब्याला सरकारने आता जिओग्राफीकल इंडिकेशन (जीआय) टॅग दिल्यामुळे हापूसच्या उत्पादकांना आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. गेल्या काही वर्षांपासून कोणता हापूस आंबा हा अस्सल हापूस यावर वाद होता, तो वाद आता मिटला आहे. जीआय टॅग लावल्याने हापूस आंब्याची निर्यात वाढणार आहे. त्यामुळे कोकणातील हापूस आता भरारी घेऊ शकेल.

हापूस आंबे देशात कुठेही पिकवा आणि विका, पण अस्सल हापूस आंबा पाहिजे असेल तर कोकणचाच हापूस अस्सल मानला जाईल असा शिक्कामोर्तब उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी केला आहे. जगात अनेक देशात हापूस आंबा विकला जातो. या आधी तो जपान, कोरिया आणि युरोपमध्येही विकला जात होता. गेल्या काही वर्षांत तो अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही जाऊ लागला आहे. पण, आता जीआय टॅगमुळे कोकणचा हापूस अस्सल मानला जाणार आहे.

 

जीआय टॅग लावण्यात आलेली फळे

एखाद्या उत्पादनाचे भौगोलिकदृष्ट्या मूळ स्थान दर्शविण्यासाठी जीआयचा वापर केला जातो.यापूर्वी दार्जिलिंगचा चहा, महाबळेश्‍वरची स्ट्रॉबेरी,जयपूरची निळ्या रंगाची मातीची भांडी, बनारसी साडी, तिरुपतीचे लाडू, कोकम यासह भारतातील ३२५ उत्पादनांना जीआय टॅग मिळाला आहे आणि आता हापूस आंबा कोकणाचा भौगोलिक संकेत म्हणून ओळखला जाणार आहे.

Related posts

शरद पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

मराठा आरक्षणासाठी सरकारच्या कानाखाली आवाज काढू, प्रसाद लाडांचा इशारा

News Desk

राष्ट्रीय पातळीवर मनसेशी युतीबाबत चंद्रकांत पाटील काय म्हणतात ?

News Desk