HW News Marathi
महाराष्ट्र

जोपर्यंत मलिकांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहणार! – देवेंद्र फडणवीस

मुंबई |  नवाबचा राजीनामा का घेत नाही याचे कारण समजले पाहिजे. जोपर्यंत तुम्ही मलिकांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहणार, अशा इशारा विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारला केला आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ईडीने अटक केल्यानंतर सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भाजपन आज (९ मार्च) मोर्चा काढला होता. भाजपचा हा मोर्चा आझाद मैदानात सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मलिक आणि महाविकासआघाडीवर टीका केली. 

फडणवीस म्हणाले, “अनिल देशमुखांना अटक केल्यानंतर त्यांचा राजीनामा घेताल, संजय राठोडांचा राजीनामा घेता. तर मग दाऊदच्या माणसाचा राजीनामा का घेत नाही?, हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालते का?, तुम्ही कुणाच्या दाढ्या कुरवाळताय हे आम्हाला समजले पाहिजे. नवाबचा राजीनामा का घेतला नाही हेसमजलेच पाहिजे. तुम्ही राजीनामा घेत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. आज मोर्चाची सुरुवात आहे. संघर्ष सुरूच रहणार, मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. काल आम्ही तुमचे पितळ उघडे केले. तुम्ही सर्वजण पंतप्रधानांना संपवण्यासाठी एकत्र येत आहात. आमचे संबंधी गुन्हेगारांशी नाही. कालचा बॉम्ब पाहिला असेल ना अजून अनेक बॉम्ब येणार आहे. आपला संघर्ष हा पोलिसांशी नाही तर पोलिसांनी अटक केले तर काही होत नाही. शांत राहा. आणि राजीनामा घेतला  नाही तर अनेक गोष्टी बाकी आहेत, असे ते सभेत म्हटले. 

उद्धवजी तुम्ही बाळासाहेबांना काय उत्तर द्याल 

“उद्ववजी तुमचे आमचे जमत नसेल, तर सोडून द्या. पण, एक दिवस बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यायचे आहे. तेव्हा तुम्हाला विचारले जाईल, अशी व्यक्ती तुमच्या मंत्रिमडळात होती. तेव्हा तुम्ह काय उत्तर द्याल?, आम्ही तर बाळासाहेबांना सांगू,की नाही बाळासाहेब आम्ही संघर्ष केला. पण, आम्ही काय करणार आपलेच सुपुत्र मुख्यमंत्री होते. ते सत्तेसाठी एवढे आंधळे होते, की त्यांचा राजीनामा घेऊ शकले नाही. कारण उद्धव ठाकरेंना माहिती होते, की राजीनामा घेतला तर महाविकासआघाडीचे सरकार जाईल,” अशा शब्दा फडणवीसांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात पुन्हा कडक निर्बंध; विवाह सोहळा ५०, तर अंत्यसंस्काराला २० लोकांना परवानगी

Aprna

धनंजय मुंडेच्या टीकेला बहीण प्रीतम मुंडेंच सडेतोड प्रतिउत्तर!

Aprna

केंद्रानंतर ठाकरे सरकारने इंधन दरात सवलत द्यायलाच हवी, चंद्रकांत पाटलांची मागणी

News Desk