HW News Marathi
महाराष्ट्र

…मग ६० वर्षांवरील राजकारण्यांनीही राजीनामे द्यावेत, विक्रम गोखलेंची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई | राज्यात सध्या ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर, काही अटी-शर्थींसह मालिकांच्या शूटिंगला देखील परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमावर आता ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोरोना काळात मालिकांच्या शूटिंगदरम्यान सेटवर जाण्यास ६० वर्षांवरील कलाकारांना परवानगी नाकारल्याने विक्रम गोखले यांनी राज्य सरकारला चांगलेच सुनावले आहे. “कलाकारांसाठी जर हा नियम असेल तर मग ६० वर्षांवरील राजकीय नेतेमंडळींनी देखील राजीनामे दयावेत”, अशी संतप्त मागणी करत विक्रम गोखले यांनी राज्य सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

“६५ वर्षांवरील कलाकार शूटिंगदरम्यान आपली संपूर्ण काळजी घेतील. मात्र, राज्य सरकारने या कलाकारांना सेटवर जाण्याची परवानगी द्यावी. नाहीतर सरकारच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ कलाकार भिकेला लागतील”, अशी संतप्त प्रतिक्रिया विक्रम गोखलेंनी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर ज्येष्ठ कलाकार, निर्माते, दिग्दर्शकांकडून मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे, “६५ वर्षांवरील कलाकारांनाही शूटिंगसाठी परवानगी देण्यात यावी”, अशी मागणी देखील करण्यात येत आहे. मात्र, राज्य सरकारने अजूनही आपला जुनाच नियम कायम ठेवला आहे. सरकार आपल्या या निर्णयावर पुनर्विचार करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणावरुन हायकोर्टाचे राज्यसरकारला खडे बोल

News Desk

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार

News Desk

मोदीसाहेब शेतकऱ्यांसोबत युध्द लढणार आहे का? – नवाब मलिक

News Desk