HW News Marathi
महाराष्ट्र

MIM सोबत जाण्याच्या निर्णयावर शरद पवार म्हणाले…

मुंबई। “कोणी कोणत्या पक्षासोबत जायाचे हे ते स्वतः सांगू शकतात. आणि ज्या पक्षासोबत जायचे आहे, त्या पक्षाचा होकार देणे गरजेचे आहे,” असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकासआघाडी एमआयएमसोबत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. पवारांनी काल (२० मार्च) बारामतीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

कोणी कोणत्या पक्षासोबत जायाचे हे ते स्वतः सांगू शकतात. आणि ज्या पक्षासोबत जायचे आहे, त्या पक्षाचा होकार देणे गरजेचे आहे. कोणत्याही पक्षासोबत जाणे हा राजकीय निर्माण आहे. हा प्रस्ताव महाराष्ट्रापुरते कोणीही प्रस्तावित केला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून असे राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला देत नाही. या प्रकारचे निर्णय राष्ट्रीय समिती स्पष्ट करत नाही तोपर्यंत अशी भूमिका घेता येत नाही. आणि महाराष्ट्रात असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे शरद पवार म्हणाले.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली होती. याभेटी दरम्यान झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये महाविकासआघाडी एमआयएमचा समावेश करा, अशी मागणी केली. यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांसोबत झालेल्या बैठकीत एमआयएमसोबत हात मिळवणी नाही, हे स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दूषित पाण्याने बाधा झालेल्यांना त्वरित चांगले उपचार द्या; मुख्यमंत्री शिंदेंचे प्रशासनाला निर्देश

Manasi Devkar

राष्ट्रवादी आमदाराच्या वडिलांना ‘कृषीरत्न पुरस्कार’ जाहीर, मुलाने ‘असं’ केलं अभिनंदन

News Desk

चिडलेल्या बच्चु कडूंनी स्वयंपाक्याला कानाखाली का मारली ?

News Desk